Actor Jitendra Plane Crash Story esakal
Premier

Plane Crash : बायकोने हट्ट केला अन् विमान चुकलं! Plane Crash मधून वाचलेल्या बॉलीवुड सुपरस्टारने केला धक्कादायक खुलासा..

Actor Jitendra Plane Crash Story : 1976 साली झालेल्या विमान अपघातात बॉलीवुडच्या सुपरस्टारचा जीव थोडक्यात वाचला. पत्नीच्या हट्टामुळे ते त्या फ्लाइटने गेले नाहीत आणि मोठ्या दुर्घटनेपासून बचवल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

Saisimran Ghashi

गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे घडलेल्या एका भयानक विमान अपघातात 270 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेने अनेकांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवांची आठवण करून दिली. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र यांनी काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शेअर केलेला एक प्रसंग पुन्हा चर्चेत आला आहे

नशिब आणि आपल्या माणसांचं प्रेम असेल तर मृत्यूही मागे हटतो,’ असं म्हणणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा एक प्रसंग आजही अनेकांना थक्क करणारा आहे. 1976 साली अहमदाबादजवळ घडलेल्या एका भीषण विमान दुर्घटनेपासून ते फक्त एका "हट्टामुळे" वाचले होते तो हट्ट होता त्यांच्या पत्नीचा.

1976 सालचा तो दिवस होता, जेव्हा जितेंद्र एका महत्त्वाच्या प्रवासासाठी विमानतळाकडे रवाना झाले होते. मात्र त्याच दिवशी करवा चौथसारखा खास सणही होता. पत्नी शोभा उपवास करत होत्या आणि चंद्रदर्शनाची वाट पाहत होत्या.

विमानतळावर पोहोचल्यावर जितेंद्र यांना समजले की त्यांची फ्लाइट दोन तास उशिराने आहे. हा वेळ पाहून त्यांनी विचार केला की, घरी जाऊन पत्नीबरोबर करवा चौथचा विधी पार पाडावा. त्यांनी घरी परत यायचा निर्णय घेतला. त्या क्षणी त्यांच्या पत्नीने त्यांना परत विमानतळावर न जाण्याचा हट्ट धरला आणि नशिबाने तो हट्ट ऐकला गेला.

काही तासांनी जेव्हा बातम्या समोर आल्या, तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पायखालची जमीनच सरकली. ज्या विमानातून ते प्रवास करणार होते, ते विमान हवेतच कोसळले होते आणि अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

हा प्रसंग सांगताना जितेंद्र आजही भावूक होतात. “त्या दिवशी जर शोभाने मला परत बोलावलं नसतं, तर मी आज तुमच्यासमोर नसतो,” असं ते अनेकदा नमूद करतात. त्या दिवशी फक्त शोभाने उपवास केला नव्हता, तर तिच्या प्रेमामुळेच माझा जीव वाचला, असंही त्यांनी म्हटलं आहे.

या घटनेने जितेंद्र यांचं आयुष्यच बदलून टाकलं. जीवनात नशिबापेक्षा माणसांचे प्रेम किती मोठं असतं, हे त्यांनी त्या दिवशी अनुभवलं. त्यांच्या मते, “आपल्या आयुष्यात काही गोष्टी अगम्य असतात. पण जेव्हा त्या तुमच्या भल्यासाठी घडतात, तेव्हा नियतीचं अस्तित्व पटतं.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT