narayangaon road
narayangaon road 
पुणे

एका वर्षातच रस्ता लागला बोलायला... 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून 2 कोटी 28 लाख रुपये खर्च करून एक वर्षापूर्वी करण्यात आलेले जु्न्नर तालुक्यातील नारायणगाव ते खोडद या रस्त्याचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पावसाळ्यात हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साठत असल्याने दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असल्याची तक्रार खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव ग्रामस्थांनी केली आहे. 

खडीकरण, डांबरीकरण, रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी जाण्यासाठी सांडपाणी व्यवस्था, साइडपट्ट्या असे या कामाचे स्वरूप होते. मात्र, ठेकेदाराने खडीकरण, डांबरीकरणाचे काम सलग न केल्याने रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. साइडपट्ट्यांची कामे न केल्याने दुचाकी घसरून एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. सांडपाणी जाण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साठत आहे. यामुळे पावसाळ्यात दुचाकी घसरून अपघात होत आहेत.

महिला दुचाकीस्वारांनी याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. शेतमालाची वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बाजूची गटारे मोकळी करून पाणी रस्त्यावर येणार नाही, अशी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण करण्याचा केले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 

पावसाचे पाणी जाण्यासाठी करण्यात आलेली गटारे काही शेतकऱ्यांनी गाडली आहेत. साइडपट्ट्यांचे काम लॉकडाउनमुळे करता आले नाही. खडीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अटीनुसार रस्ता खराब झाल्यास पुढील एक वर्ष दुरुस्त करून देण्याची जबाबदारी माझी आहे. 
 - विजय चौधरी, ठेकेदार 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT