indapur milk 
पुणे

राज्य सरकार आंधळं, बहिरं अन् बधीर : हर्षवर्धन पाटील

डाॅ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : महाविकासआघाडीचे राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफी, शेतीमाल व दुधास हमीभाव देण्यास आणि कोरोना महामारी रोखण्यात अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यासाठी काही दिले नाही. त्यामुळे हे सरकार आंधळं, बहिरं व बधीर असल्याची टीका भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधास प्रती लिटर 30 रुपये भाव द्यावा, गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये आणि दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुका भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई आठवले गटाच्या वतीने दूध दर वाढ आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिस ठाण्यापासून आंदोलन मोर्चास सुरुवात झाली. त्याचा समारोप इंदापूर तहसील कार्यालयासमोर करण्यात आला. आंदोलनात सहभागी गाईच्या अंगावरील राज्य सरकारचा जनावरांकडून निषेध हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या वेळी पोलिस, नागरिक, पत्रकार आणि कोविड सेंटरमध्ये आंदोलनकर्त्यांच्या वतीने मसाला दूध देण्यात आले.

या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्याचे दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे आहेत, मात्र त्यांनी दूध दरवाढी संदर्भात एक शब्द देखील बोलला नाही. त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा नाही. या उलट दूधगंगाने अमूलशी करार केल्यानंतर संघ अवसायिनात काढण्याचा प्रयत्न राज्यमंत्र्यांनी केला. इंदापूर कोविड केंद्रात औषधे, स्वच्छता, व्हेंटिलेटर सुविधा नाही. आम्ही 40 वर्ष लाल दिवा बघितला असून, त्याचा वापर लोकहितासाठी केला असून, करत राहणार आहे. एमआयडीसी, शासकीय अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून जीवनावश्यक किट घेऊन वाटून त्याचे फोटो काढून स्वतःची प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे स्वप्रसिद्धी करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचे काम राज्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यमंत्री हे काठावर पास झाले असून, ते मेरिटच्या गप्पा मारत आहेत. त्यांनी आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, ही नीती सोडली पाहिजे. आम्ही केले तर राजकारण आणि तुम्ही केले तर ती सेवा, ही वृत्ती सोडली पाहिजे. 

या वेळी दूधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, माजी सभापती विलास वाघमोडे, ऍड. कृष्णाजी यादव, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा संघटक शिवाजी मखरे, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, सोशल मीडिया प्रमुख हर्षवर्धन कांबळे यांची भाषणे झाली. या वेळी लालासाहेब पवार, भरत शहा, रघुनाथ राऊत, महेंद्र रेडके, सुभाष काळे, कांतीलाल झगडे, अशोक इजगुडे, बाळासाहेब मोरे, माउली वाघमोडे, गणेश महाजन, दादासाहेब पिसे, संदीपान कडवळे, धनंजय पाटील, कैलास कदम, सागर गानबोटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT