पुणे

दक्षिण पुण्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : दक्षिण पुण्यातील नागरिकांसमोर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभा राहिले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. कात्रज-आंबेगाव-कोंढवा रस्ता परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. तरी प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यांविषयी काळजी घेऊन पाणी संकट दूर करण्याची मागणी होत आहे.

वडगाव पंपिग स्टेशन येथून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील केदारेश्वर टाकी आणि महादेवनगर टाकी पूर्ण क्षमतेने भरली जात नाही. परिसरात रात्री अपरात्री पाणी येते. दक्षिण पुण्यातील नागरी वस्ती आणि आजूबाजूला नवीन इमारती पाहता टाकीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत नव्हते. मात्र, आता केवळ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा त्रास झाला नाही. मात्र, आता पाणीटंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

यासंबंधी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि स्वारगेट पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्याचबरोबर, प्रशासनाने पुन्हा सोमवारपासून पाणीपुरवठ्यात बदल केला आहे. या भागातील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद राहणार आहे. राजीव गांधी पंपीग स्टेशन येथून केदारेश्वर आणि महादेवनगर या टाक्यांना पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही टाक्यांतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या परिसराचे प्रशासनांकडून सात उपविभाग करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे एका उपविभागाचा आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

''पूर्वी पाणीपुरवठा व्यवस्थित होत होता. परंतु, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदलानंतर हा त्रास सुरु झाला आहे. पाणीटंचाईसाठी पूर्णपणे प्रशासनाचा ढिसाळपणा कारणीभूत आहे. खडकवासला धरणांतून पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा सुरु असल्याचे सांगण्यात येते. मग मध्येच पाण्याची चोरी होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. तसे असेल तर प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा आम्ही अंदोलनाचा मार्ग अवलंबू.''

- युवराज बेलदरे, स्थानिक नगरसेवक

''पाणीटंचाई मोठ्या प्रमाणांवर असून पूर्वी एवढा त्रास होत नव्हता. पाण्याचे नियोजित वेळापत्रक नाही. अपुरा पाणीपुरवठा असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन पाणीपुरवठा सुरळित करून आम्हाला होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्त करावे''

- राजाराम वीर, स्थानिक नागरिक कात्रज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT