rain
rain 
पुणे

राज्यपालांना शेतकरी करणार नुकसान भरपाईची रक्कम परत

सकाळ वृत्तसेवा

मंचर (पुणे) : राज्यपालांनी शेतकऱ्यांना एकरी तीन हजार 200 रुपये म्हणजेच प्रति गुंठा 80 रुपये अशी अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. त्यातून बियाण्यांचाही खर्च भागणार नाही. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी ही मदतीची रक्कम नाकारणार असून मनिऑर्डरद्वारे ही रक्कम राज्यपाल यांना परत करणार आहेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितले. 

"आंबेगाव तालुक्‍यात भात, नाचणी, वरई, कांदा, बटाटा, लसून व तरकारी माल पूर्णपणे वाया गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना केंद्र सरकारचा एकही मंत्री व अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आला नाही. यावरूनच सत्तेत असलेल्या भाजप सरकारची शेतकऱ्यांबाबत असलेली भावना लक्षात येते. त्वरित शेतकऱ्यांना सरसगट 50 हजार रुपये मदत मिळावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,' असा इशारा बांगर यांनी दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT