पुणे - दिवसातील एक हजार ४४० मिनिटांपैकी तुमच्या हृदयासाठी तुम्ही फक्त रोजच्या रोज न चुकता ४० मिनिटे द्या... तुमचे हृदय तंदुरुस्त राहील... असा सल्ला पुण्यातील हृदयरोग तज्ज्ञांनी दिलाय.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउननंतर आता आपण सर्वजण ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली अंगिकारण्याच्या प्रयत्न आहोत. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या आणि संसर्ग न झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी दिवसभरात ४० मिनिटं चाललं पाहिजे, असे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी सांगितले. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी रक्त पातळ होण्याची औषधे दोन महिने जरूर घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपचारातील बदल
कोरोना उद्रेकापूर्वी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्याच्या मार्गदर्शक सूचना जगभर होत्या. तशाच त्या आपल्याही देशात होत्या. त्यानंतर रक्त पातळ करण्याची औषध देण्याचा सल्ला दिला जाई. पण, कोरोना उद्रेकात रक्त पातळ करण्याची औषधे ही सर्वप्रथम रुग्णाला देण्यात येतात. हा उपचारातील बदल कोरोनात झाला. कारण, कोरोना झालेल्यांच्या रक्तात गाठ निर्माण होऊन तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना रक्त पातळ होण्याचे औषध दिल्यानंतर ते बरे झाले. कोरोनामुळे या रक्ताच्या गाठी तयार झाल्या होत्या. कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन तयार होणारा हा अडथळा नव्हता, असे निदान झाल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
कशी असावी न्यू नॉर्मल जीवनशैली
कोरोनाच्या भीतीने रुग्ण आजार अंगावर काढतात, ते उपचारांसाठी रुग्णालयात जात नाहीत. छातीत दुखतंय, ॲसिटीडी असेल, तर यामुळे घाबरून न जाता, तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ
आकडे काय सांगतात
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.