पुणे - ‘कोरोना’ विषाणूचा उद्रेक झालेल्या नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांचीही आरोग्यतपासणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने नव्याने दिल्या आहेत. आत्तापर्यंत चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमधून येणाऱ्यांचीच तपासणी करण्यात येत होती. देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
देशात आतापर्यंत केरळमध्ये ‘कोरोना’चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग देशातील नागरिकांना होऊ नये, यासाठी ‘कोरोना’चा उद्रेक झालेल्या भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्यतपासणी विमानतळावर केली जात आहे. ताप, सर्दी, खोकला अशी ‘कोरोना’च्या संसर्गाची लक्षणे आढळणाऱ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे; तसेच चीनमधील वुहान शहरामधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत.
‘कोरोना’बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत २९१ प्रवासी आले आहेत; तर ४८ हजार २९५ प्रवाशांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
‘एनआयव्ही’कडून ८३ नमुन्यांची तपासणी
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे १८ जानेवारीपासून आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत ८३ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिला. वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झालेल्या ८३ पैकी ८१ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तीनजण मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.