पुणे

केंद्राने पाकिस्तानला लस दिल्याने देशात अनेकांचा मृत्यू : नाना पटोले

अशोक गव्हाणे

पुणे : ''कोरोनाने सर्वचजण संकटात सापडलेले असताना देशातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे सोडून केंद्र सरकारने पाकिस्तानला लस दिली, त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. याला केंद्र सरकार जबाबदार'', असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसिटिकल सायन्स आणि इंदुताई कॉलेज ऑफ फिजीओथेरपी या दोन नवीन महाविद्यालयाचे उद्घाटन पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि उपाध्यक्ष रोहित टिळक यांनीही संस्थेच्या वाटचालींबद्दल बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेशउपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ. प्रणिती टिळक, अभय छाजेड, दत्ता बहिरट, डॉ. गीताली टिळक, अविनाश बागवे आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, ''कोरोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. कोरोना हा मानवनिर्मित असून हे अमेरिकेसारखा देशही सांगत आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाची सुरवात झाली. आजही लसीकरण झाल्यावरही कोरोना होतो. पण, जीव वाचतो आणि त्रास होत नाही. त्यामुळे देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यांसाठी १३० कोटी लोकांना २६० ते ३०० कोटी लसीच्या डोसची गरज आहे. अशावेळी पंतप्रधानांनी दुश्मन देश पाकिस्तानसह इतर देशांना लस दिली. तीच लस आपल्या देशात दिली असती तर देशातील अनेकांचे जीव वाचले असते. गंगेत मृतदेह दिसले नसते''

तसेच, ''केंद्र सरकारने कोणालाही सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. पत्रकारांसह अनेक महत्वाच्या व्यक्तीचे फोन टॅपिंग केलेय. त्यामुळे लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे. टिळकांनी ब्रिटिश सरकारला डोकं ठिकाणावर आहे का? असं विचारलं होतं, तसेच आता केंद्रामधील मोदी सरकारचंही डोकं ठिकाणांवर आहे का नाही हे विचारण्याची वेळ आली'' असल्याचे पटोले यांनी म्हणत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

स्थानिक स्वराज संस्था स्वबळावरच लढणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचे निश्चित झाल्याचेही पटोले यांनी म्हटले. पुणे महापालिकेत भाजपने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत लोक भाजपला नाकारून काँग्रेसचा स्वीकार करतील, असे पटोलेंनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT