Students Admission 
पुणे

अकरावी अॅडमिशन : एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी; पसंतीक्रम नोंदविण्याची मुदत...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख १५३ वर पोचली आहे. तर प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी सोमवारपर्यंत (ता.७) अंतिम मुदत आहे. 

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती यांच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या एक लाख सहा हजार ७७५ जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत या जागांच्या प्रवेशासाठी १ लाख १५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८३ हजार २७७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असून तो लॉक केला आहे. तर जवळपास ८२ हजार ६४८ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून (व्हेरिफाय) झाले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी एकूण ७४ हजार २४२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी ३० हजार ६०२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर आता प्रवेशासाठी एकूण ७६ हजार १७३ जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रवेश समितीतर्फे देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT