NCP Chief Sharad Pawar speaks abour CAA and NRC  
पुणे

सरकारकडून धार्मिक, सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यात आले आहे. आठ राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे प्रतिनिधी असूनही त्यांनी एनआरसीला विरोध केला आहे. रामविलास पासवान यांचीही नागरिकत्व कायद्याला विरोध आहे. सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका पोचविण्यात येत आहे. सरकारने कायदा आणून मुद्दाम अस्थिरता निर्माण केली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशभर हिंसक आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. 

शरद पवार म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकत्व कायद्याला संसदेला विरोध केला. लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील सामाजिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे. तीन देशांतील एनआरआय नागरिकांना नागरिकत्व देण्याची ही खेळी आहे. देशातील मुळ समस्यांपासून लक्ष हटविण्याची ही खेळी आहे. विशिष्ट धर्मांतील नागरिकांवर लक्ष केंद्रीत करून गरिबांवर परिणाम होत आहेत. श्रीलंकेतील तामिळ नागरिकांचा विचार का केला नाही. आसाममधील लाखो नागरिक नाराज आहे. पुण्यात अनेक नेपाळी नागरिक आहेत, त्यांचे काय? 30 वर्षांपासून ते पुण्यात स्थायिक आहेत. महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसत आहेत. केंद्र आणि राज्यात जाणीवपूर्वक अंतर निर्माण केले जात आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT