Onion
Onion 
पुणे

कांद्याचे गणित यंदा चुकलेलेच!

हरिदास कड

चाकण - कांद्याचे न उगवणारे बियाणे, रोपांचे पावसाने झालेले नुकसान, बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, लागवडी झालेल्या कांद्याचे अवेळी पावसाने झालेले नुकसान, हवामानाचा फटका आदी  कारणांमुळे कांद्याच्या उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यातील बाजारांत कांद्याची आवक ८० ते ८५ टक्क्यांनी घटली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाकण बाजारात गुरुवारी कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपयांचा भाव मिळाला. हे दर पुढील काही महिन्यांत साठ रुपयांवर जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. किरकोळ बाजारात कांदा ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. राज्यात प्रसिद्ध असलेल्या चाकण बाजारात दरवर्षी डिसेंबर महिन्यापासून नवीन कांदा विक्रीसाठी येतो. 

बाजारात सध्या दर आठवड्याला सुमारे २५० ट्रॅक्टर, टेम्पो कांद्याची आवक होत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ही आवक खूप कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक वीस टक्के आहे. गेल्या वर्षी दर आठवड्याला सुमारे साडेबाराशे ट्रॅक्टर, टेम्पो इतकी कांद्याची आवक होत होती. कांद्याचा हंगाम मार्च महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. गरवा जातीच्या निर्यातक्षम कांद्याची आवक सध्या होत आहे. परंतु, आवक कमी असल्याने देशांतर्गत विक्रीसाठी कांदा कमी पडत आहे. त्यामुळे व्यापारी, कंपन्या निर्यातीसाठी कांदा खरेदी करत नाही. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. परिणामी कांद्याचे एकरी उत्पादन कमी मिळत आहे. जेथे एक एकरला दोनशे गोण्या कांदा निघत होता, तेथे यंदा फक्त पन्नास गोण्या उत्पादन निघत आहे. गरवा कांद्याचा हंगाम पुढील महिन्यात अंतिम टप्प्यात येणार आहे. कांद्याची आवक यंदा कमी होत आहे. परिणामी बाजारात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याचे व्यापारी राम गोरे, प्रशांत गोरे, संपत पानसरे यांनी सांगितले. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने कांद्याच्या भावात सध्या वेगाने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री ५० ते ४० रुपये भावाने केली जात आहे.

घाऊक बाजारात एका किलो कांद्याला सध्या ३५ ते ४५ रुपयांचा भाव मिळत आहे. गेल्या वर्षी गरवा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. यंदा झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार लागवडी कराव्या लागल्या, तसेच बियाण्याच्या तुटवड्यामुळे यंदा कांदा लागवड कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा उत्पादन व आवकेत यंदा मोठी घट झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. पण उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. 
- विनायक घुमटकर, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT