Online-Services 
पुणे

#OnlineServices पहा महा-ई-सेवा केंद्रचालकांना दाखल्यामागे किती रुपये मिळतात

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महा-ई-सेवा केंद्रचालकाला एका दाखल्यामागे केवळ दहा रुपये मिळतात. केंद्रांमधून नागरिकांना केवळ चार-पाच सुविधाच देण्यात येत आहेत. त्यामुळे व्यवसायात मोठी गुंतवणूक करूनही नुकसान होत आहे. त्यामुळे भाडेकरारनामा दस्त नोंदणीसोबतच अन्य कामे मिळावीत, अशी मागणी केंद्रचालकांनी केली.

केंद्रात जातप्रमाणपत्र वगळता इतर सर्व ऑनलाइन दाखल्यांसाठी ३३ रुपये ६० पैसे आकारण्यात येतात. या शुल्कापैकी दहा रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होतात. दहा रुपये हे प्रोसेसिंग शुल्क हे टीसीएस कंपनीला द्यावे लागतात. तीन रुपये ६० पैसे हा जीएसटी घेतला जातो. राहिलेले दहा रुपये हे केंद्रचालकांना मिळतात. 

राज्य सरकारने तहसील कार्यालयीन ३२ आणि जिल्हाधिकारी कार्यालयीन ४३ सेवा नागरिकांसाठी शुल्क आकारणीसह देण्याचे निर्धारित केले होते; परंतु १२ वर्षांनंतरही या सेवा सुरळीतपणे सुरू नाहीत.   

केंद्रातून सुरू असलेली आधार कार्डची कामे बंद केली. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडूनही भाडेकरार दस्त नोंदणीचे काम थांबविले आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षकांनी पुनर्विचार करून पुन्हा या सेवासुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या व्यवसायात तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. काही केंद्रचालकांकडून चुका झाल्यास त्यांना जरूर शिक्षा द्यावी; परंतु सर्व केंद्रचालकांना एकसारखे समजून त्यांच्यावर अन्याय करू नये, असे आवाहन केंद्र चालकांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Crime : भाजप नेत्याची गुंडागर्दी! शेतकऱ्याला कारखाली चिरडून मारले, वडिलांना वाचवायला आलेल्या मुलींचेही फाडले कपडे

Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडरक्षण हीच खरी शिवसेवा: छत्रपती शाहू महाराज; जय शिवरायचा जयघोष..

Mumbai Rain Update: मुंबईत सायंकाळी वादळी पाऊस! पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या लढतीवर पावसाचं सावट! सामना न झाल्यास काय होणार? राखीव दिवस आहे का?

भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'श्री विठ्ठलाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू'; कार्तिकी यात्रेची तयारी पूर्ण..

SCROLL FOR NEXT