Bhagat_Singh_Koshyari 
पुणे

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्रीपद घटनाबाह्य आहे. त्यामुळे ही राज्यातील सर्व पदे तत्काळ रद्द करावीत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

या मागणीसाठी ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी कोशियारी यांना पत्र पाठविले आहे. राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६३ (१) मधील तरतुदीत पालकमंत्री या पदाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुळात हे पदच घटनाबाह्य ठरते आहे. मग पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीकडून बैठका कोणत्या नियमाच्या आधारे घेतात? असा सवाल या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

परिणामी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय लोकाभिमुख नसतात. हे सर्व निर्णय राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून आणि एका विशिष्ट हेतूने घेतले जातात. यामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. शिवाय या जबाबदारींमुळे संबंधित मंत्र्यांचे त्यांच्या मूळ खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT