Sarpanch-Reservation 
पुणे

पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण कधी?

सकाळवृत्तसेवा

शेटफळगढे - जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण काढण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यास येत्या २१ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. मात्र, सरपंचपदाची आरक्षणे निश्‍चित झालेली नाहीत. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

जिल्ह्यातील येत्या जुलै ते डिसेंबर २० या कालावधीत मुदत संपत असलेल्या ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका व प्रभाग रचना आरक्षण कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार सुरू झाली आहे. यानुसार ४ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

यावर येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत ग्रामस्थांना हरकती दाखल करता येणार आहेत. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पूर्ण केली जाणार आहे. तसेच, उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठविलेले सुनावणीचे प्रस्ताव तपासून येत्या १७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने या प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. 

या प्रक्रियेत सर्वांत महत्त्व असलेल्या सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणापूर्वी सरपंचपदाची आरक्षण निघणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा कार्यक्रम सध्या प्रशासनाने चालवलेला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत इच्छुकांमध्ये संभ्रम राहणार आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ सरपंचपदाची आरक्षणे जाहीर करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT