Sharad-Pawar 
पुणे

कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांचे काम समाधानकारक, शरद पवारांनी थोपटली पाठ

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम समाधानकारक आहे. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटली. पोलिस उपायुक्‍तांच्या बदल्यांच्या विषयात जे बोलले जाते, त्यात काहीच तथ्य नाही. ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने केल्या जातात. आमच्यात यावरून कोणताही वाद नाही, असे सांगून पवार यांनी त्यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

व्यापारी असोसिएशनची बैठक आज पवार यांच्या उपस्थित झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मुख्यमंत्र्यांना भेटायला पवार स्वतः जातात, आताही पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांच्या नाराजीमुळे ते चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पोचले. पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत जाणे चांगले नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पवार यांच्यावर टीका केली होती. त्याकडे पवार यांनी 
दुर्लक्ष केले.

‘आमच्यामध्ये कोणतीही अस्वस्थता किंवा नाराजी नाही. राज्यासमोर जेव्हा काही प्रश्‍न निर्माण होतात, त्यावेळी आम्ही एकत्र बसून विचार करतो. त्यामुळे त्या भेटीत काही विशेष नाही. दुसऱ्या एका कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ गेलो होतो. त्यांच्याबरोबर माझ्या घरी बैठक करायची असेल, तर माझे घर तेथून १४ किलोमीटर अंतरावर आहे. त्याऐवजी जेथे मी गेलो, तेथून एका फर्लांगावर मुख्यमंत्र्यांचे घर असेल तर मला तेथे जाण्यात काहीच कमीपणा वाटत नाही. चंद्रकांत पाटलांना त्याची चिंता वाटत असेल, तर त्यावर माझे काहीही म्हणणे नाही,’’ असे सांगत पवार यांनी पाटील यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले.

पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हातात सत्ता घेतली, त्यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात गतीने पावले टाकण्यासंबंधीचा विचार केला होता. परंतु, कोरोनाचे संकट आल्यावर त्यांचा प्राधान्यक्रम बदलला. त्यामुळे बाकीची कामे थांबवावी लागली आणि कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये त्यांना लक्ष घालावे लागले. कोरोनाच्या विषयात मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दिवसातून १४ ते १५ तास बैठका होतात, हे मी पाहतो आहे. या बैठकांची आवश्‍यकताही आहेच. अशा काळात विरोधकांनी टीका टिप्पणी करू नये.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रमुखांनी बाहेर पडूच नये
मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाहीत, अशी टीका वारंवार होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्यांनी बाहेर पडणे म्हणजे लोक गर्दी करतात. त्यामुळे शक्‍यतो प्रमुख लोकांनी बाहेर पडूच नये, असे माझे मत आहे. त्यांना नागरिकांशी बोलायचे असेल तर अनेक साधने उपलब्ध आहेत. ज्याच्याकडे संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी असते, त्याने नेहमीच सावधपणे भूमिका घ्यायची असते. जी मुख्यमंत्री घेत आहेत. एखाद्या भूमिकेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या प्रशासकाची असते, त्यावेळी त्याला दहावेळा विचार करावा लागतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेस बंद; महाराष्ट्रातील ट्रेन सेवा कमी, यूपी-बिहारसाठी स्पेशल गाड्यांचा पाऊस

UP: योगींचे लाडक्या बहिणींना 'गिफ्ट'! हजारो जणींना नियुक्ती पत्रे; पुढच्या महिन्यापासून पगार सुरू, जाणून घ्या काय आहे खास?

Hingoli News: रब्बी उत्पादकांना दिलासा; ई-पीक पाहणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेवटची संधी

Latest Marathi News Live Update : शेअर बाजारात सेन्सेक्स 1,800 अंकांनी कोसळला

Pune Passport News: मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला; नवीन ठिकाणाहून ३० मार्चपासून सेवा, पुणे व परिसरातील नागरिकांना दिलासा!

SCROLL FOR NEXT