Shortage of onion seeds in Pune district due to heavy rain 
पुणे

पुणे जिल्ह्यात कांदा बियाणांचा तुटवडा; अतिवृष्टीने रोपे गेली वाहून

गजेंद्र बडे

पुणे :  जिल्ह्यातील कांदा लागवडीसाठी आवश्‍यक असलेली कांद्याची रोपे ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने वाहून गेली आहेत. यामुळे रोपांअभावी कांदा लागवडी अडचणीत आली आहे. दरम्यान, ही रोपे पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही सर्वपक्षीय सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत, कांदा बियाणे तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले आहे. अतिवृष्टीत सुमारे 15 हजार हेक्‍टरवरील कांदा रोपे वाहून गेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने रोपांची निर्मिती करावी लागणार आहे. मात्र या नवीन रोपांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक कांदा बियाणे बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने हे बियाणे तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अध्यक्षा पानसरे यांनी भुसे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात 61 हजार 816 हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती. यासाठी 78 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय शेतकऱ्यांनी स्वतः निर्मित केलेल्या बियाणे हे 100 क्विंटलहून अधिक होते. तसेच गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात रोपांची दुबार निर्मिती करण्याची गरज भासली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी बियाणांचा पुरवठा सुरळीत झाला होता. यंदा मात्र नेमके याच्या उलट चित्र आहे. गेल्या वर्षी कांद्याला भाव आल्याने, शेतकऱ्यांनी घरच्या घरी बियाणांची निर्मिती केली नाही. त्यातच यंदा अतिवृष्टीने कांदा रोपे वाहून गेली आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात कांदा पिकाचे सरासरी क्षेत्र 50 हजार 177 हेक्‍टर आहे.

कांदा बियाणे तुटवड्याची प्रमुख कारणे
- चालू वर्षीच्या पावसाळ्यात कांदा रोपांचे नुकसान.
- पाऊस संपल्यानंतर निर्माण केलेली रोपे अतिवृष्टीने वाहून गेली.
- शेतकरी निर्मित कांदा बियाणे गतवर्षीच्या तुलनेत यंदा खूप कमी.
- रोपांच्या दुबार निर्मितीमुळे बियाणांच्या पुरवठ्यात तूट.
- गतवर्षीच्या तुलनेत मागणीत दुप्पटीने वाढ.
- गेल्या वर्षी कांद्याला भाव मिळाल्याने बियाणे निर्मितीत मोठी घट


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT