Exam  sakal media
पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या तयारीसाठी शाळांचा पुढाकार

‘शाळा, महाविद्यालये बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवा’, असा आदेश राज्य सरकारने काढला.

मीनाक्षी गुरव

पुणे : ‘शाळा, महाविद्यालये बंद आणि ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू ठेवा’, असा आदेश राज्य सरकारने काढला. मात्र, दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा तोंडावर असताना, पुन्हा शाळा बंद म्हटल्यावर शिक्षक, विद्यार्थी पालकांचा ‘टेन्शन’ वाढले. परंतु यातून मार्ग काढण्यासाठी आता शाळा पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. शाळांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याचा लेखन सराव, सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा अशी तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेणे शक्य होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. (Corona : Schools And Colleges Closed)

‘शाळा, महाविद्यालये बंद’ करण्याचा राज्य सरकारचा आदेश म्हटल्यावर शिक्षण संस्थांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे बंधन आले. शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि ऑनलाइन शिक्षण पुन्हा सुरू झाले. दरम्यान, प्रत्यक्ष शाळेत ८० ते ८५ टक्के उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हजेरीपट ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यावर २० ते ३० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे निरीक्षणही शिक्षकांनी नोंदविले आहे.

शाळांमध्ये सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येत आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले,‘‘विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम सुरू राहतील, असे राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखनाचा कमी झालेला सराव भरून काढण्यासाठी शाळांमध्ये पूर्व परीक्षा, सराव परीक्षा आयोजित केल्या जात आहेत. तसेच लेखनातील दोष विद्यार्थ्यांना सांगून योग्य मार्गदर्शन केले जात आहे. त्यासोबत वर्षभरातील प्रयोग, नोंदवह्या, स्वाध्याय, प्रकल्प, अंतर्गत मूल्यमापनाशी निगडित कामकाज शाळांमध्ये सुरू आहे.’’

सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यावर भर

‘‘प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी दररोज मोठ्या उत्साहाने शाळेत हजेरी लावत होते. आता पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडला आहे. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सराव प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात येत आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी किमान परीक्षेमुळे अभ्यासात लक्ष घालत आहेत. परंतु शाळा बंदमुळे इयत्ता पाहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.’’

- एकनाथ बुरसे, मुख्याध्यापक, एच. ए. हायस्कूल, पिंपरी

किमान दहावी-बारावीचे वर्ग सुरू करावेत

‘‘राज्यात लाखो विद्यार्थी सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. संपूर्ण वर्ष ऑनलाइन शाळेनंतर आता कुठे नियमित वर्ग सुरू झाले होते, त्याला पुन्हा ‘ब्रेक’ लागला. काही शाळांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याची लगबग होती, परंतु काही शाळांनी सराव परीक्षा सुरू केल्या आहेत. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या त्यावेळी विद्यार्थ्यांची हजेरी ८० ते ८५ टक्के इतकी होती. परंतु ऑनलाइन वर्गात केवळ ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हजर राहत आहेत. त्यातही सातत्य नसल्याचे निदर्शनास येते.’’

- सुजित जगताप, सचिव, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

‘‘ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा पाहता, शाळा सुरू करणे गरजेचे आहे. तरच सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचू शकणार आहे. शाळा बंद असल्यामुळे विशेषत: झोपडपट्टी, वस्त्यांमधील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांकडूनच शाळा सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.’’

- डॉ. अनिता साळुंके, मुख्याध्यापिका, डॉ. आंबेडकर मेमोरियल टेक्निकल हायस्कूल, पुणे कॅन्टोमेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT