Marathi Sahitya Sammelan 2023 Sakal
पुणे

Marathi Sahitya Sammelan 2023 : मराठी लेखक सत्याला निधडेपणाने सामोरे जात नाहीत, भावी संमेलनाध्यक्षांचे परखड मत

तर त्याचे परिणाम विविध पद्धतीने तुम्हाला भोगावे लागतात.

सकाळ वृत्तसेवा

Marathi Sahitya Sammelan 2023 - समाजातील अनेक घटनांचे योग्य चित्रण मराठी साहित्यात झाले नाही. आणीबाणीच्या काळाचा वेध घेणाऱ्या अतिशय कमी कादंबऱ्या मराठीत आहेत.

दोन अपवाद वगळता दुष्काळाचे भीषण वास्तव मांडणारी कादंबरी मराठीत नाही. याचे कारण मराठी लेखक सत्याला निधडेपणाने सामोरे जात नाहीत, असे परखड मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे डॉ. शोभणे यांचा गुरुवारी (ता. ६) सत्कार करण्यात आला.

या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ. शोभणे म्हणाले, ‘‘पंथातीत होण्याचा, धर्मातीत होण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरी एक अदृष्य सत्ता तुम्हाला पुन्हा तिकडेच ओढत नेते. तुम्ही ओढले गेला नाहीत.

तर त्याचे परिणाम विविध पद्धतीने तुम्हाला भोगावे लागतात. त्यातूनच मग ‘रवींद्र शोभणे हा साहित्यिक आहे काय’ किंवा ‘आता सुमारांची सद्दी झाली आहे का’ , असे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न विचारणारे सुमारच आहेत, हे विशेष. टीका करायची असेल तर नक्कीच करा. मात्र, माध्यमांनी लेखकाचे तटस्थपणे मूल्यमापन केले पाहिजे.’’

सत्काराप्रसंगी ज्येष्ठ कथाकार आणि माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, डॉ. शोभणे यांच्या पत्नी अरुणा शोभणे, परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी या वेळी उपस्थित होते. कसबे म्हणाले, ‘‘निवडणुका वाईट नाहीत, त्या चांगल्याच आहेत.

परंतु, भांडवलशाहीचा विकास होत गेला तसतशी निवडणूकही पैशाची दासी होत गेली. ज्यांची ईडीची धाड पडावी, अशी पात्रता आहे तेच निवडणूक लढवू शकतात. त्यामुळेच महाराष्ट्र साहित्य परिषदेने साहित्य संमेलनाची निवडणूक ईडीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही केला. अशा संस्थेचा अध्यक्ष असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.’’

सासणे म्हणाले, ‘‘समाजात संभ्रमाची स्थिती आहे. जगण्यातील गुंतागुंत वाढली आहे. अशा काळातही डॉ. शोभणे यांनी सामाजिक पर्यावरणात झालेल्या बदलाचा आढावा साहित्यातून घेतला आहे. समाजातील सत्व शोधणारा हा लेखक आहे.’’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

‘निवडणुकांसाठी महामंडळावर दबाव’
संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यासाठी महामंडळावर दबाव टाकला जात असून, लेखक त्यासाठी वर्षभर आधी लॉबिंग करत आहेत. निवडीबाबत साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली जात आहे.

पुरस्कार दिले नाही तर मनमानी केल्याचे म्हटले जाते. लेखकांनी स्वतःहून आपली पतप्रतिष्ठा जपली पाहिजे. साहित्याची प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी साहित्य संस्थांसह लेखकांचीही आहे, असे मत परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा

SCROLL FOR NEXT