पुणे : शिवाजीनगर गावाठाणात बंद सदनिकेमध्ये आढळलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्युने अनेकांची मने हेलावली. त्यांच्या मृत्युचे ठोस कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र पुरुषाचा मृत्यु ऋदयविकाराच्या धकक्याने झाला असण्याची व त्यांच्या पत्नी या मनाने हळव्या असल्याने त्यांना हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा ही मृत्यु झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी दोघाचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवाजीनगर गावठाणातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या संभाजी बापू शिंदे (वय 75) व शोभा संभाजी शिंदे (वय 70) या पती-पत्नीचे मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली होती.
दरम्यान, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्युने परिसरातील नागरीकांकडुन हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे दाम्पत्यला मुलबाळ नव्हते. ते दोघेच सदनिकेमध्ये राहात होते. त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे ठराविक दिवशी येत, तसेच तसेच फोनवर त्यांच्याशी संपर्कत होते. मात्र मागील आठ दिवसापासून त्यांचा फोन उचलला जाट नसल्याने शोभा शिंदे यांच्या बहिणीची मुलगी शनिवारी त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन त्यांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी दोघाचा मृतदेह आढळला होता.
- 'अभ्यासक्रम कमी केला, तशी 'फी' पण कमी करा'; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?
एकाचवेळी दोघाचा मृत्यु झाल्याने पोलिसही त्यांच्या मृत्युचे नेमके कारण काय, हे शोधण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टिने त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. तसेच वैद्यकीय कारणही शोधत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर म्हणाले, "शिंदे यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली तेव्हा, संभाजी शिंदे यांना यापूर्वी दोनदा ऋदयविकाराचा त्रास झाला होता. तर धकक्याने झाला असण्याची व त्यांच्या पत्नी शोभा या मनाने हळव्या होत्या. कदाचित संभाजी शिंदे यांचा हार्ट अटैकने मृत्यु झाला असेल. शिंदे यांचा झालेला मृत्यु हळव्या मनाच्या शोभा शिंदे यांना सहन झाला नसेल. त्यात त्यांचाही मृत्यु झाला असन्याची शक्यता आहे. तरीही ठोस कारण पुढे आले नाही. त्यामुळे डॉक्टरानी त्यांचा व्हिसेरा राखुन ठेवला आहे. त्याच्या अहवालातुन मृत्युचे कारण कळेल."
एखाद्या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यानंतरही मृत्युचे कारण समजत नसेल तर, त्या व्यक्तीच्या शरीरातील काही भागांचे नमूने घेतले जातात. या नमुन्याची रासायनिक प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यातुनच संबंधीत व्यक्तीचा मृत्यु केव्हा झाला, विष प्राशन, गला दाबल्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने झाला आहे, यातुन मृत्युचे कारण स्पष्ट होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.