2000 Rupees Note
2000 Rupees Note Sakal
Personal Finance

2000 Rupees Note: ज्यांचे बँक खाते नाही, ते 2,000 रुपयांच्या नोटा कशा बदलणार?

राहुल शेळके

2000 Rupees Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे. यासह, देशाच्या मध्यवर्ती बँक आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा जारी न करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा काढून घेण्याचे आदेशही देण्यात आले असून यासाठी बँकांना विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.

ज्यांचे बँक खाते नाही, ते 2000 रुपयांच्या नोटा कशा बदलणार?

आरबीआयच्या या नव्या निर्णयानुसार ज्यांचे बँक खाते नाही ते लोक 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत का?

आरबीआयने यासाठीही व्यवस्था केली आहे आणि आपल्या निर्णयात स्पष्टपणे लिहिले आहे की ज्यांचे बँक खाते नाही ते देखील बँकेत जाऊन 20,000 रुपयांपर्यंतच्या 2000 च्या नोटा एकावेळी बदलू शकतात.

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत एक FAQ जारी केला आहे, ज्यानुसार अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत RBI च्या काय सूचना आहेत?

  • 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता किंवा जमा करता येतील.

  • 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.

  • एका वेळी 20,000 रुपये बँकेत बदलले किंवा जमा केले जाऊ शकतात.

  • आरबीआयच्या 19 शाखांमध्येही नोटा बदलता येतील.

  • याचा अर्थ आरबीआय आणि इतर सर्व बँकांमध्ये नोटा बदलता येतील.

  • एकूण रक्कम एकावेळी 20,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

सन 2016 च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या.

मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

Latest Marathi News Live Update: ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के..

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT