सप्तरंग

Vidhan Sabha 2019 : टीका करा पण...

कृपादान आवळे

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रचारसभांमध्ये खालच्या पातळीवरून वक्तव्ये करणं सुरु केलं आहे. 

भाजपसाठी 'सेफ' समजल्या जाणाऱ्या कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हारपूरचे असल्याने बाहेरून आणलेला उमेदवार म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, मी पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेलो असून, इतकी वर्षे मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे मी काय गोट्या खेळल्या का? असा सवाल केला. 

खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी अशाप्रकारचे विधान करणे हे कितपत योग्य आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्याचे महसूलमंत्रिपदाची जबाबदारीही आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करणं ही राजकीयदृष्ट्या चालणारी बाब असली तरीदेखील गोट्या खेळणं म्हणणं हे काही केल्या पटणारं नाही. कारण ते आजच्या घडीला भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र, नेतेमंडळींनी टीकाटिप्पणी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं नाव न घेता निशाणा साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, आम्ही काय असं-तसं इथं आलं आहोत का? आम्ही काय बांगड्या घातलेल्या नाहीत. ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात हे दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांनी विसरु नये, असे म्हटले. अजित पवार हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. अजित पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे राजकीय संतापातून व्यक्त झाल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT