Sugarcane esakal
सातारा

ठाकरे सरकारसह मोदींकडून FRP चे तुकडे करण्याचा कुटिल डाव

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : एकरकमी एफआरपीचे (FRP) तीन तुकडे करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे. हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात शेतकरी सरकारला धडा शिकवतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja Shetkari Sanghatana) जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला (Sajid Mulla) यांनी दिलाय.

राज्य आणि केंद्र सरकार एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कुटिल डाव रचत आहे.

मुल्ला पुढे म्हणाले, निती आयोगाला पुढे करून राज्य आणि केंद्र सरकार (Central Government) एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कुटिल डाव रचत आहे. पहिली उचल ऊस गाळप झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर उर्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना हंगाम संपण्यापूर्वी अथवा हंगाम संपल्यानंतर दोन टप्प्यांत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाला राजकीय व्यासपीठ सोडून विरोध करायला पाहिजे. एफआरपी म्हणजे, ऊस गाळप झाल्यानंतर उसाची बिले १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे हा कायदा आहे, तरीही अनेक साखर कारखान्यांनी उसाची बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत.

सातारा जिल्ह्यातील किसनवीर कारखाना भुईंज, फलटण तालुक्यातील स्वराज कारखान्याने शेतकऱ्यांची उसाची बिले दिली नाहीत. एफआरपीचे तीन तुकडे केल्यामुळे तर शेतकरी पुरता अडचणीत सापडणार आहे. एकीकडे उसाची बिले वेळेवर मिळणार नाहीत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी सोसायटीमधून काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी हेक्टरी नऊ ते दहा हजारांचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांतून विरोध होऊ लागला आहे. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर आगामी काळात शेतकरी राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT