Ajit Pawar  sakal
सातारा

रुग्ण वाढल्यास पुन्हा कठोर निर्णय घेणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार आज साताऱ्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना रुग्णांची संख्या(covid patients) अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची प्रत्येक जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी आज पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत येथे पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात रुग्णालयातील बेडची(hospitals bed) संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न असेल. साताऱ्यासाठी ज्या बाबी लागतील, त्या देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाची पाहणी आणि उद्‌घाटन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आले आहे. तसेच आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो. त्यावेळी आपण एकमेकांसमोर येतो. त्या वेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो.

नारायण राणेंना अजित दादांचा चिमटा

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील यशानंतर नारायण राणेंनी याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करणार असे वक्तव्य केले होते. याविषयी विचारले असता श्री. पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीत यश-अपयश येतंच असतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. मात्र, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगले यश मिळाले. राणेंनी पुढं काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे कसे टिकेल. येणाऱ्या संकटावर मात करून जनतेला योग्य दिशेने कसे नेईल, यासाठी प्रयत्न राहणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा सातत्यानं केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रूपानं आणखी एक माणूस आला आहे. खरं तर नारायण राणेंनी मागे असेच सन १९९९ ते २००४ कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला. सहा आमदार फोडले; पण त्यात त्यांना यश आले नाही.’’ त्यानंतर दहा वर्षे सरकार टिकले, याचा दाखला देत उपमुख्यमंत्र्यांनी राणेंचा चिमटा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT