bhishis file Photo
सातारा

भिशीचा फंडा येऊ लागलाय चालविणाऱ्यांच्या अंगलट?

अरुण गुरव

कोरोना कालावधीत भिशी फुटताना ज्यांनी उचल घेतली आहे, त्यांनी परत पैसे न दिल्याने ‌‌भिशीला घरघर लागली आहे. त्यामुळे भिशी चालवणाऱ्या लोकांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र मोरणा विभागात आहे.

मोरगिरी (सातारा): ग्रामीण भागात भिशीत (फंड) आर्थिक गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. गरजू लोकांना गरजेवेळी पैसे मिळत असल्याने ग्रामीण भागात लोक अर्थवाहिनी म्हणून त्याकडे बघत आहेत. मात्र, कोरोना कालावधीत भिशी फुटताना ज्यांनी उचल घेतली आहे, त्यांनी परत पैसे न दिल्याने ‌‌भिशीला घरघर लागली आहे. त्यामुळे भिशी चालवणाऱ्या लोकांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र मोरणा विभागात आहे.

मुंबईसह अन्य शहरांमध्ये काम करणाऱ्या चाकरमानी, व्यापारी, स्थानिकांनी आपल्या घरातील कुटुंबांना वेळेवर आर्थिक मदत व्हावी, म्हणून आयुष्यभर जमा केलेली पुंजी पतसंस्थेत किंवा बँकेत जमा करून ठेवली आहे. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीला ना पतसंस्था आली ना बँक आली. त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या भिशीने गरजूंना आर्थिक मदतीचा हात दिला. भिशीत प्रत्येक जण महिन्याला ठरलेली ठराविक रक्कम भरत असतो. ती रक्कम यातील दोघांच्या नावावर बँकेत जमा केली जाते. गरजूंना कमीतकमी व्याज दरात उचल म्हणून कर्ज दिले जाते.

यासाठी कोणतीच कागदपत्रे घेतली जात नाहीत. वेळेत आणि हमखास पैसे मिळत असल्याने लोकांच्या गरजा, अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. पतसंस्थेत कर्ज घेण्यासाठी लोकांना संचालक मंडळाची विनवणी करावी लागते. गटातटाच्या राजकारणामुळे गरजू लोकांना कर्जपुरवठा केला जात नाही. त्यामुळे भिशी लोकांना वरदान ठरू लागली आहे. कोरोना काळात व अन्य तांत्रिक अडचणींमुळे फंडातून रक्कम घेतलेल्या व्यक्तीने पैसे भरले नसल्याचे अनेक उदाहरणे घडत आहेत. त्यामुळे भिशीस घरघर लागली असून, ती चालवणाऱ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र मोरणा विभागात दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Lohagad murder case: लोहगडावर मे महिन्यापासून ‘रेकी’, कॉल-मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट; केतन अग्रवाल खून प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

SCROLL FOR NEXT