Uday Samant esakal
सातारा

शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका : उदय सामंत

शिवसेना सातारा पालिकेच्या 15 जागा लढवणार

उमेश बांबरे

साताऱ्यात आम्ही संख्येने दिसायला कमी जरी असलो तरी आम्हाला कमी लेखू नका. राजकारणात काही घडू शकते.

सातारा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Satara Local Body Election) शिवसेना (ShivSena) पूर्ण क्षमतेने लढणार असून, धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवार लढतील. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूत्र असणार का, याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेणार आहेत. सातारा पालिकेच्या किमान 15 जागा आम्ही लढवू, यश किती कसे असेल माहीत नाही; पण चिवट संघर्ष हा सेनेचा बाणा आहे, अशी माहिती उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सातारा तालुका व शहर परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत म्हणाले, ‘‘सातारा शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा प्रथमच होत आहे. संघटनात्मक पातळीवर शाखा विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून शिवसेना सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण क्षमतेने व पक्षचिन्हावर लढण्याची धारणा आम्हा शिवसैनिकांची आहे; पण राजकारणात काही तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.’’

राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र राबविण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, तो जे आदेश देतील. त्या आदेशाला आम्ही शिवसैनिक म्हणून बांधील असू, अशी ग्वाही त्यांनी दिली. साताऱ्यातील राजेगटाचा प्रभाव, सेनेची सुप्तावस्थेतील महिला आघाडी आणि संघटनात्मक बांधणीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर किती यश मिळणार, या प्रश्नांना सामंत यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘साताऱ्यात आम्ही संख्येने दिसायला कमी जरी असलो तरी आम्हाला कमी लेखू नका. राजकारणात काही घडू शकते, कोणाचा कसा उदय होईल याचा नेम नाही. साताऱ्यात राजेगटाचा प्रभाव असला, तरी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीची सुरुवात साताऱ्यातून आहे. ही आमची पहिलीच बैठक आहे. सेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर उमेदवार लढतील. सातारा पालिकेच्या किमान पंधरा जागा आम्ही लढवू, यश किती, कसे असेल माहीत नाही; पण चिवट संघर्ष हा सेनेचा बाणा आहे.’’

साताऱ्यातील सेनेच्या राजकीय हालचाली गृह राज्यमंत्र्यांना मान्य आहेत का? असे विचारताच सामंत म्हणाले, ‘‘सर्व गोष्टीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. तो आदेश गृह राज्यमंत्रीही मान्य करतात. सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची आमची भूमिका ठरली आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रभाग तेथे शाखा हे उद्दिष्ट मी ठेवले आहे. त्याच्या पूर्तीसाठी मला साताऱ्यात बोलवा मी तयार आहे.’’ भाजपची महाविकास आघाडीवर वारंवार टीका होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री संयमी असून, आमचे लक्ष विकासावर आहे. उत्तर आम्ही पण देऊ शकतो. या टीकेला साताऱ्यात महिला आघाडीने उत्तर दिले म्हणजे आघाडी सक्रिय नाही असे नाही. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून संघटनात्मक बांधणीचे पश्चिम महाराष्ट्रात काम सुरू आहे, याचे परिणाम तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT