Rice Planting esakal
सातारा

पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी..; पारंपरिक 'भलरी'वर भात लागणीला वेग

सूर्यकांत पवार

कास (सातार) : पावसाचे आगार असलेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यात भात लावणीस (Rice Planting) वेगाने सुरुवात झाली असून शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात (Heavy Rain) भाताची लावणी करण्यात व्यस्त आहेत. भाताच्या शिवारात ‘रामा हो रामा ..रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी.. माझ्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं, ध्यान मला रामाचं.. मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, वाईच्या डोंगरी गजबारल्या तोरणी..! अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादत आहेत. (Paddy Planting Started In Jawali Mahabaleshwar Taluka bam92)

कास, बामणोलीसह जावली, महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे.

कास, बामणोलीसह जावली, महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल मातीच्या, मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी पिके घेतात. या भागातील जमिनी कमी सुपिक, डोंगरउताराच्या तसेच लालमातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते.

पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते. डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून पावसात शेतकरी भातलावणी करत आहेत. भातलावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणत आहेत. भातलावणीसाठी अनेकांची आवश्यकता असल्याने एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत आहे.

‘पैरा’ परस्परांना मदत करण्याची प्रथा

वस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भातलावणी होण्यास मदत होते. सर्वांच्या भातलावण्या सुरू असल्याने औताला दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तर मेढा विभागातील सपाट भागात रोटावेटर व इतर चिखलणी करण्याच्या यंत्रांनी चिखलणी केली जात आहे.

Paddy Planting Started In Jawali Mahabaleshwar Taluka bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT