Shivendraraje-Udayanraje
Shivendraraje-Udayanraje esakal
सातारा

साताऱ्यातील राजे समर्थकांच्या हाणामारीची पोलिस चौकशी करणार?

उमेश बांबरे

सातारा : येथे मंगळवारी (ता. सात) झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या (Satara Municipal Election) पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांना (Satara Police Station) ठोस पावले टाकावी लागणार आहेत.

साताऱ्यात झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापली ताकद दाखविण्यासाठी संघर्षाच्या ठिणग्या उडण्याचे प्रकार शहरामध्ये नवीन नाहीत. अनेकदा या कालावधीमध्ये मारामारीचे प्रकार घडल्याचा इतिहास आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यापासून शहरातील या संघटित गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरवात झाली. संदीप पाटील यांच्या कालावधीत खासगी सावकारीतून होणाऱ्या संघटित गुन्हेगारीवर ठोस कारवायांना सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील अनेकांना जरब बसली. त्याचा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठा वाटा राहिला. गुन्हेगारांवर कडक कारवाई होऊ लागल्याने सशस्त्र हल्ल्यांबरोबरच व्यावसायिक व सर्वसामान्यांच्या पिळवणुकीचे प्रमाण कमी येण्यास मदत झाली. त्यानंतरच्या काळात शहरातील अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर पोलिसांचे काही प्रमाणात दुर्लक्षच राहिले. त्यामुळे कोणत्याही ठोस कारवाया झाल्या नाहीत. परिणामी, अवैध धंदे व छोट्या व्यावसायिकांकडून होणारी वसुली छुप्या पद्धतीने बिनबोभाट सुरू राहिली. युवकांच्या टोळक्यांचा ठिकठिकाणी उपद्रव सुरूच आहे.

निवडणुका संपल्यानंतर अशा लोकांचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे त्यांचे उद्योगही सुप्तपणे सुरू राहतात; परंतु निवडणुकांच्या वर्षात आपले अस्तित्व व उपद्रवमूल्य दाखविण्याच्या प्रयत्नात अशा प्रवृत्ती उफाळून येत असतात. त्याची चुणूक परवा शहरात झालेल्या सशस्त्र हल्ल्यातून दिसून आली. आगामी कालावधीत शहरामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही. सुरवातीच्या प्रकारांमध्येच पोलिसांकडून कडक कारवाई झाली, तरच इतरांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पोलिसांची गुन्हेगारांवरील जरब वाढली, तरच भविष्यात निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर अंकुश बसू शकतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहर परिसरातील शंभरपेक्षा जास्त जणांच्या तडीपारीचे आदेश काढले आहेत. त्याच पद्धतीने पालिका निवडणुकींचा विचार करून पोलिसांनी आतापासूनच कामाला लागणे आवश्यक आहे.

गोपनीय यंत्रणा ॲक्टिव्ह करणे आवश्‍यक

सातारा पालिकेच्या हद्दवाढीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. प्रभागांची संख्या वाढल्याने सहाजिकच इच्छुकांची संख्याही वाढणार आहे. परिणामी सातारा पालिकेसाठी होणारा संघर्षही मोठा असणार आहे. त्यामुळे शहर व शाहूपुरी पोलिसांनी या वाढीव भागातील प्रवृत्तींचा माग आतापासूनच काढावा लागणार आहे. उपद्रवी घटक बाहेर कसे राहतील, यासाठी रणनीती आखावी लागणार आहे. त्यासाठी शहर व शाहूपुरी पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा ॲक्टिव्ह करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT