Mahesh Shinde
Mahesh Shinde esakal
सातारा

'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

अतुल वाघ

वाठार स्टेशन (सातारा) : शशीकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) आपल्या भाषणात सातत्यानं म्हणतात, मला निवडून दिलं नसल्यानं कोरेगाव तालुक्याचं मोठं नुकसान झालंय. 2013-14 ला यांना मंत्री पद दिलं. त्यावेळी उरमोडीतील पाणी सांगलीत गेलं. मात्र, मतदारसंघातील गुंठाभर जमीन भिजली नाही. आता पुन्हा मंत्री झालं असते, तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता. त्यामुळे जे झालं त्यात जिल्हा खुश झाला, असा सणसणीत टोला कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी पिंपोडे खुर्द येथील जाहीर सभेत लगावला.

राष्ट्रवादीचे शशीकांत शिंदे पुन्हा मंत्री झाले असते, तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता.

पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील पाणी पुरवठा योजना (Water supply scheme), तसेच 82 लाखांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल कदम, जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे, भाजप (BJP) तालुकाध्यक्ष संतोष जाधव, पोपट भोज, विलास पवार, अमर पवार, चंद्रकांत पवार, शिवाजी कदम, दिनकर कदम, तानाजी गोळे, रत्नदीप फाळके, सातारारोडचे सरपंच किशोर फाळके उपस्थित होते. महेश शिंदे पुढे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात (Koregaon constituency) मागील दहा वर्षांत येथील माजी आमदाराने खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका घेत केवळ नारळ फोडण्याचा उद्योग केला. या नारळानेच त्यांना घरचा रस्ता दाखवला तरीही हे महाशय अजूनही नारळ फोडत आहेत. मी शिवसेनाचा (Shiv Sena) आमदार आहे, याचं भान ठेवा. त्यामुळे माझ्यावर बोलताना विचार करून बोला आणि माझ्या नादाला लागू नका, नाहीतर आता थोडक्यात पडलायं. पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही, असा इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला.

आमदार शिंदे म्हणाले, मी जातीवंत शेतकरी आहे. आम्ही डोंगरात भात पिकवत नाही. आम्ही पायऱ्याने शेती करतो. जोपर्यंत आमच्या पायऱ्यातील शेवटच्या शेतकऱ्यांची मळणी होत नाही, तो पर्यंत आम्ही पायऱ्या सोडत नाही. पायऱ्या सोडण्याची आमची नाही तर, ती तुमची औलाद आहे, असा टोला त्यांनी यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला. आठवड्यापूर्वी याच स्टेजवर त्यांची सभा झाली. त्यावेळी मी कोणत्या पक्षात आहे, ते समजत नाही असा प्रश्न त्यांनी केला होता. खरंतर यावेळी या स्टेजवर बसलेली लोक शुद्धीत नव्हते. मी आमदार झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघात झालेला बदल त्यांना दिसत नाही. त्यामुळे ते आता शुद्धीत नाहीत. ते त्यांच्या भाषणात सतत बोलतात मला निवडून दिलं नसल्याने कोरेगाव तालुक्याच मोठं नुकसान झालं. 2013-14 ला यांना मंत्री पद दिलं. त्यावेळी उरमोडीतील पाणी सांगलीत गेलं. मात्र, मतदारसंघातील गुंठाभर जमीन भिजली नाही. आता पुन्हा मंत्री झालं असते तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता. त्यामुळे जे झालं त्यात जिल्हा खुश झाला, असा टोला ही त्यांनी लगावला.

केवळ खोट बोलण्यात माहिर असलेल्या माजी आमदार शशीकांत शिंदेंनी कोरोना काळात 10 वर्षांपासून त्यांना साथ देणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबईला पळ काढला. यावेळी मी आणि माझे कार्यकर्ते या लढाईत झोकून घेत येथील जनतेसाठी कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आणि पहिल्या लाटेत 1400 रुग्णांना जीवदान दिले. आजही हे काम सुरू आहे. आपण काय केलं आपण 300 बेडच कोरोना हॉस्पिटल कुठं उभारलं त्याचा शोध अजून लागला नाही. यावेळी राहुल कदम, श्रीपाद कदम, जितेंद्र कदम, नामदेव कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT