सातारा

अवकाळी पाऊस धडकला; गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान झाले आहे. या पावसाचा परिणाम दुष्काळी तालुक्यात देखील पाहवयास मिळत आहे. 

बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे डिस्कळ, बुध परिसरातील गहू, ज्वारीची पिके ठिक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत. दरम्यान आज (गुरुवार) पहाटेपासुन माण तालुक्यात सर्वत्रच ढगाळ हवामान झाले हाेते. ठिकठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस पडू लागल्यामुळे शेतकरी बाधंवाची धांदल सुरु झाली आहे.
 
विशेषत: म्हसवड भागातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील काढणी केलेले कांदे माळरानात वाळण्यासाठी पसरले असून ते पावसाने भिजू नये म्हणून त्यावर प्लॅस्टीक कागद झाकून सुरक्षित ठेवण्यात गुंतले आहेत. काढणीस आलेल्या गव्हाच्या व ज्वारीच्या उभ्या पिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

मातीची भाजीव विट उत्पादन करणा-यांचीही या अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ लागले आहे. भट्टीत भाजण्यापुर्वी ऊन्हात सुकविण्यासाठी ठेवलेल्या विटां या अवकाळी पावसाने भिजल्यामुळे नुकसान होणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सद्यःस्थितीत, मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा, ज्वारीची पिके काढून ठेवली आहेत. ती या अवकाळीत सापडू नयेत यासाठी मळून धान्य घरी आणण्याची शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. परिणामी वेगवेगळ्या संकटातून सावरताना शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT