वीजबिल Sakal
सातारा

सातारा : वीजबिल वसुली चांगली; तर दुरुस्तीस प्राधान्य

साताऱ्यात २१८ गावांत ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

सातारा : रब्बीचा हंगाम सुरू असून, शेतीपंपांच्या वीज मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यासोबतच विजेच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘महावितरण’ने पुन्हा एकदा ''एक गाव, एक दिवस'' हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या गावांत वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले आहे, अशाच गावांत हा उपक्रम प्राधान्याने राबवून तेथील सर्व वीज समस्या दूर करण्याचा प्रयत्न ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. आतापर्यंत सातारा मंडलातील २१८ गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून ''एक गाव, एक दिवस'' हा उपक्रम वीज समस्यांवर रामबाण उपाय ठरला आहे. त्यामुळे हा उपक्रम आता ‘महावितरण’तर्फे संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. या उपक्रमासाठी गावाची निवड करताना सर्वप्रथम त्या गावातून होणाऱ्या वसुलीचा विचार केला जात आहे.

त्यापाठोपाठ इतर निकष लावून गावात ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणा एकाच दिवशी जाते. जाताना पुरेशे मनुष्यबळ, साधनसामुग्री सोबत असते. यामध्ये विजेचे खांब, तारा, स्टे, किटकॅट, रोहित्राचे ऑईल इत्यादींचा समावेश आहे. तर वीजबिलाच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी लेखा विभागाचे कर्मचारीही सोबत असतात. एकूणच गावातील नागरिकांच्या विजेबाबतच्या सर्व समस्या निवारण्याचे काम या उपक्रमात केले जाते.

त्याचा फायदा पुढे वसुलीला होतो. गावातील झुकलेले, मोडलेले खांब उभे करणे, तारांना ताण देणे, जास्त झोळ असल्याने मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे, रोहित्राची व वितरणपेटीची देखभाल, दुरुस्तीची कामे करणे, अनधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे तसेच नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे आदी कामे केली जातात. तर वीजबिलातील त्रुटी, नावात बदल या तक्रारींचेही जागेवर निराकरण करण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याने अनेक गावांतून या उपक्रमासाठी आग्रह धरला जातो. आतापर्यंत बारामती मंडलात १७९, सोलापूर २४० तर सातारा मंडलातील २१८ गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

वीजबिल भरण्यासाठी केंद्रासोबत ऑनलाइन पर्याय

ग्राहकांनीही वापरलेल्या विजेचे वीजबिल वेळेत भरणे त्यांचे कर्तव्यच आहे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी ‘महावितरण’ने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासोबतच अनेक ऑनलाइन पर्याय दिले आहे. नवीन नियमांनुसार एक नोव्हेंबरपासून एका महिन्यात पाच हजारांहून अधिकचे वीजबिल रोखीने स्वीकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, गुगल पे, फोन पे आदी युपीआय ॲपचा वापर करून दरमहाचे वीजबिल भरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT