Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

जीवापल्याड जपलेली आंब्याची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी; कांदाटी खोऱ्यात 700 झाडे वणव्यात खाक

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : कोयना जलाशयापलीकडे असणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील लामज (ता. महाबळेश्वर) येथील शेतकरी प्रदीप सखाराम कदम यांनी कष्टाने फुलवलेली आंब्याची तसेच इतर झाडांची बाग अज्ञाताने लावलेल्या वणव्याच्या आगीने होरपळून गेली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लामज हे छोटेसे गाव असून, या गावातील प्रदीप कदम या युवकाच्या शेतात पाच वर्षांची रत्ना आंब्याची 150 झाडे, चार वर्षांची हापूस आंबा 50 झाडे आहेत. तसेच चिकू, काजू, खैर, नारळ, साई सरबत्ती निंबू प्रत्येकी दहा अशा सुमारे 300 फळझाडांची लागवड केली आहे. त्यांनी ही झाडे आपल्या मुलाप्रमाणे जपली होती. परंतु, अज्ञाताने लावलेल्या वणव्यात ही वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने श्री. कदम यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. 

जीवापलीकडे जपलेली ही बाग आता फळाला आली होती. यापासून आता उत्पन्न सुरू होणार होते, तोच या संकटाने कदम यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या अज्ञाताने आग लावली असेल, त्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. हजारो रुपये खर्च करून मी जीवापलीकडे जोपासलेल्या फळबागेतील हिरवी गर्द झाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक स्त्रोत सुरू होण्याअगोदर मातीमोल झाल्याने मी आर्थिक संकटात सापडलो आहे. वणवा लावणाऱ्यांवर कडक शासन व्हायला हवे, असे श्री. कदम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT