Karad Municipality esakal
सातारा

नगराध्यक्षांनी पत्र देवूनही प्रशासनाकडून सभा घेण्यास होतेय टाळाटाळ

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

इतिवृत्त लिखाण अपूर्ण असल्याचे कारण सांगून प्रशासकीय पातळीवर सभा घेण्यास टाळाटाळ होते आहे.

कऱ्हाड (सातारा): पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या सभा घेण्याबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पालिकेच्या प्रशासकीय विभागाला पत्रे दिली आहेत. इतिवृत्त लिखाण अपूर्ण असल्याचे कारण सांगून प्रशासकीय पातळीवर सभा घेण्यास टाळाटाळ होते आहे. त्याबाबतही नगराध्यक्षा शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. त्यामुळे सभा न होण्यामागे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सर्वजण कारणीभूत आहेत, त्यांच्या दिरंगाईने सातवेळा मुख्याधिकारी, सभा अधिक्षकांना सुचीत करूनही त्यांनी सभा घेतलेल्या नाहीत, असे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी स्पष्ट केले.

पालिकेची वर्षात एकच मासिक सर्वसाधारण सभा तर सहा महिन्यापूर्वी स्थायी समितीची सभा झाली आहे. त्या दोन्ही सभा व्हाव्यात, यासाठी लोकशाही व जनशक्ती आघाडी आक्रमक झाली. नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे लेखी पत्र देवून त्यांनी मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचा इशारा दोन्ही आघाड्यांनी दिला आहे. त्यासोबतच नगराध्यक्षा शिंदे यांही बैठक न होण्यास जबाबदार आहेत, असाही आरोप केला आहे.

ठरावावर स्वाक्षऱ्यासह मागील इतिवृत्ताचे काम अपूर्ण असल्याने सभा घेत नसल्याचे लोकशाहीचे अध्यक्ष सौरभ पाटील व जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचे म्हणणे आहे. नगराध्यक्षा शिंदे यांनी जानेवारीपूर्वीपासून सभा घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पत्र व्यवहार केला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके व सभा अध्यक्षांनाही त्यांनी सात वेळा पत्र लिहून सभा घ्याव्यात, अशा सूचना नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी केल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी इतिवृत्ताचे काम अपूर्ण असल्याचे कारण सांगून सभा घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. वास्तविक सभा व्हावी, यासाठी पहिल्यापासून पाठपुरावा करत आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या दिरंगाईने सभा होत नाही, असे नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेची मासिक सर्वसाधारण व स्थायी समितीच्या बैठका घेण्यासह बैठकांचे प्रोसिडिंग पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकारी, सभा अधीक्षकांना दिल्या आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास प्रशासनाकडून विलंब होतो आहे. त्याची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांनी चार, पाच बैठकीत काय घडले आहे. काही घेतलेल्या बैठकाही कुणामुळे व ऐनवेळेला रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे बैठका रद्द होण्यासाठी फक्त मी जबाबदार नाही. अन्य सर्वजण त्याला तितकेच जबाबदार आहेत.

- रोहिणी शिंदे,नगराध्यक्षा, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 24 विभागांत विभागलेली मुंबई; एकूण वॉर्ड किती? कारभार सोपा की गुंतागुंतीचा? पाहा मुंबई महापालिका निवडणुकीचं संपूर्ण गणित

पाकड्याची लाज गेली! BBL पदार्पणात Shaheen Afridi ला गोलंदाजी करण्यापासून रोखले; अम्पायरने कान टोचले, नेमके काय घडले? Video

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर ,भुसावळ, रावेर यावल तालुक्यातील बाजारात मक्याची आवक वाढली

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

SCROLL FOR NEXT