Jarandeshwar Factory esakal
सातारा

साताऱ्यातील तीन कारखाने 'Top Ten'मध्ये; ऊस गाळपात कृष्णा, जरंडेश्‍वर, सह्याद्रीची बाजी

उमेश बांबरे

सातारा : यावर्षीच्या ऊस गाळप हंगामात सातारा जिल्ह्यातील जरंडेश्‍वर कारखाना (Jarandeshwar Factory), सह्याद्री साखर कारखाना (Sahyadri Factory) आणि कृष्णा कारखान्याने (Krishna Factory) राज्यात पहिल्या दहा कारखान्यांत आपले नाव नोंदविले आहे. त्यामध्ये सर्वाधिक गाळपात जरंडेश्‍वर शुगरचा पाचवा क्रमांक, तर साखर उताऱ्यात सह्याद्री कारखान्याचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे. सर्वाधिक ऊस दर देण्यातही या तीन कारखान्यांचा समावेश झाला आहे. (The Top Ten Sugar Factories In Maharashtra Is Krishna Jarandeshwar Sahyadri In Satara District)

कोरोनाच्या संकटातच यंदा साखर हंगाम सुरू झाला. यामुळे अनेक कारखान्यांच्या तोडणी यंत्रणा विस्कळित होत्या.

कोरोनाच्या संकटातच (Coronavirus) यंदा साखर हंगाम सुरू झाला. यामुळे अनेक कारखान्यांच्या तोडणी यंत्रणा विस्कळित होत्या. अनेक कारखाने सुरवातीपासून ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला होता. या सर्व अडचणींवर मात करत सातारा जिल्ह्यातील 15 कारखान्यांनी हंगाम पूर्ण केला. जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 144 दिवस गाळप करून 99 लाख 8 हजार 21 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून एक कोटी 11 लाख 63 हजार 420 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी साखर उतारा 11.27 टक्के मिळाला आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्याचा साखर उतारा जास्त आहे. त्यामुळे पुढील हंगामात सहकारी कारखान्यांकडून जास्त दर मिळणार आहे.

या हंगामात "जरंडेश्‍वर', "सह्याद्री' व "कृष्णा' कारखान्याने आपले नाव राज्याच्या पहिल्या दहा कारखान्यांत नोंदविले आहे. उच्चतम गाळप केलेल्या पहिल्या दहा कारखान्यांत जरंडेश्‍वर शुगरचा पाचव्या क्रमांकावर बाजी मारत 14 लख 38 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे सर्वाधिक साखर निर्मितीतही तिसऱ्या क्रमांकावर असून, 16 लाख 56 हजार 150 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यापाठोपाठ सह्याद्री कारखान्याने 15 लाख 49 हजार 500, तर कृष्णा कारखान्याने 14 लाख 76 हजार 200 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. उच्चतम साखर उतारा मिळालेल्या पहिल्या दहा कारखान्यात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखान्याचा सहावा क्रमांक असून, या कारखान्याला 12.67 टक्के उतारा मिळाला आहे.

दर देण्यात पडले मागे....

गाळप आणि साखर निर्मिती व उताऱ्यात सातारा जिल्ह्यातील कारखाने अग्रेसर असले, तरी दरात मात्र, मागे पडले आहेत. राज्यात उच्चतम ऊस दर दिलेल्या पहिल्या दहा कारखान्यात जिल्ह्यातील एकाही कारखान्याचा समावेश झालेला नाही. अनेक कारखान्यांनी 80:20 चे सूत्र स्वीकारल्यामुळे दरात मागे पडले आहेत. काही कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊसबिलेही दिलेली नाहीत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशावेळी कारखान्यांनी उर्वरित बिले दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

राज्यातील सर्वाधिक दर देणारे साखर कारखाने (कंसात दिलेला दर) ः सोनहिरा, कडेगाव (3176), कुंभी कासारी कुडित्रे, करवीर (3119), दूधगंगा वेदगंगा, बिद्री- कागल (3075), निनाईदेवी साखर कारखाना, करंगुळी- शिराळा (3053), पंचगंगा साखर कारखाना, हातकणंगले (3040).

The Top Ten Sugar Factories In Maharashtra Is Krishna Jarandeshwar Sahyadri In Satara District

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT