'... अन्यथा FRP साठी गनिमीकाव्याने आंदोलन'; बळीराजा संघटनेचा इशारा  sakal media
सातारा

'... अन्यथा FRP साठी गनिमीकाव्याने आंदोलन'; बळीराजा संघटनेचा इशारा

दहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करीत असून, यापुढे एकरकमी एफआरपीसाठी गनिमीकाव्याने आंदोलन केले जाईल

हेमंत पवार

कऱ्हाड : एकरकमी एफआरपीसाठी आज साखर आयुक्तांसमवेत बैठक आयोजिण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीस साखर कारखानदारांना बोलवलेले नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेने त्या बैठकीवर बहिष्कार टाकून साखर आयुक्तांच्या पत्राची आज तहसीलदार कार्यालयासमोर होळी केली. दरम्यान, दहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करीत असून, यापुढे एकरकमी एफआरपीसाठी गनिमीकाव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज दिला.

अध्यक्ष पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याचा तोडगा निघावा, यासाठी मागील आठवड्यात प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी साखर आयुक्तालयाशी संबंधित लोकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये साखर आयुक्तांबरोबर आज बैठक आयोजिण्याचे ठरले होते. त्यानुसार आज आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर बैठक आयोजिली आहे. त्या बैठकीस केवळ शेतकरी संघटनेच्या नेत्यांनाच बोलविण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांना बोलविले नाही. त्यामुळे त्या बैठकीवर बळीराजा संघटनेने बहिष्कार घालून आज त्या पत्राची तहसीलदार कार्यालयासमोर होळी केली.

दरम्यान, यापुढील आंदोलनासंदर्भात पंजाबराव पाटील म्हणाले, ‘‘आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळावे, यासाठी आंदोलन केले होते. मुठभर शेतकऱ्यांनी साथ दिली, तर ढिगभर खटल्यावर बसून आम्हाला आशीर्वाद दिले. सरकारने कायद्याचा वापर करून शेतकऱ्यांना न्याय देता येतो. मात्र, कारखानदारांच्या हातातच सरकार असल्याने न्याय दिलेला नाही. मुजोर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल, तर शेतकऱ्यांनी साथ द्यायला हवी होती. साखर आयुक्तांनी आम्हाला फसविण्याचाच प्रयत्न केला. ते साखर कारखानदारांच्या आमिषाला बळी पडले. आता आम्ही आंदोलन स्थगित करीत असून, यापुढे गनिमी काव्याने बळीराजा शेतकरी संघटनेकडून आंदोलन करून कारखानदारांना सळो की पळो करून सोडू.’’

अधिकारी मंत्र्यांचे गुलाम झालेत

साखर आयुक्त आणि प्रशासनाने आमची बोळवण केली. ते मंत्र्यांचे गुलाम म्हणून राहिले आहेत, असा आरोप करून बी. जी. पाटील यांनी आमच्याबरोबर मुठभर मावळे असले, तरी ढिगभर शेतकऱ्यांनी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी बळीराजा संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वंचितांचा आवाज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT