Pune-Bangalore National Highway
Pune-Bangalore National Highway esakal
सातारा

ट्रकला कार धडकल्याने भुयाचीवाडीत दोघी ठार; ठाण्याचे चारजण गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

भुयाचीवाडी येथे राजपुरोहित ढाब्यासमोर हा अपघात झाला आहे.

उंब्रज (सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) भुयाचीवाडीजवळ सातारा ते कऱ्हाड लेनवरील ढाब्यासमोर उभ्या असणाऱ्या ट्रकला भरधाव कारची भीषण धडक बसली. त्यात कारमधील एक महिला जागीच ठार झाली, तर १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालकासह अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला.

परमजित अविनाश भटनागर (वय ४७), वनशिका विक्रम शेट्टी (वय १६, रा. ठाणे) अशी मृतांची नावे आहेत. अविनाश महेशचंद्र भटनागर (चालक, वय ५२), कश्या भटनागर (वय १४), विक्रम शेट्टी (वय ५१), अद्विका शेट्टी (वय १७, सर्व रा. कल्याण-ठाणे) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी (Umbraj Police) दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील माहिती अशी : पुणे-बंगळूर महामार्गावर भुयाचीवाडीजवळील ढाब्यासमोर ट्रक थांबला होता. त्यादरम्यान साताऱ्याहून कोल्हापूककडे जाणारी कार (क्र. एमएच ०५ ईए २६४२) ही भरधाव वेगात येऊन उभ्या असणाऱ्या ट्रकला धडकली. त्यात कारमधील परमजित यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या वनशिका हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

कारमधील अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महामार्ग रुग्णवाहिका व १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. कल्याण-ठाणे येथील भटनागर व शेट्टी या दोन कुटुंबांतील सहाजण सहलीसाठी गोव्याला निघाले होते. त्यावेळी सकाळच्या सुमारास चालकाला झोप आल्याने अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कारचालक अविनाश यांना अपघाताने धक्का बसला असून पत्नी परमजित यांचा मृत्यू झाल्याने ते मानसिक तणावाखाली आहेत.

महामार्गाकडेला वाहने उभी केल्याने धोका

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या ढाब्यासमोर महामार्गावर ट्रकचालक वाहने उभी करत असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव गेले आहेत. परंतु, महामार्ग देखभाल-दुरुस्ती विभागाकडून महामार्गावर वाहने थांबवत असल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अजून किती जीव गेल्यानंतरच जाग येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT