TRAI
TRAI 
विज्ञान-तंत्र

देशात 118.34 कोटी लोकांकडे मोबाईल, 75.75 कोटींपर्यंत इंटरनेट; TRAI ची आकडेवारी जाहीर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात जानेवारी, 2021 मध्ये 96 लाख मोबाईल ग्राहक वाढले आहेत. सध्या देशातील एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या ही 118.34 कोटींवर गेली आहे. इंटरनेटची सुविधा देखील 74.74 कोटींवरुन वाढून 75.76 कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India - TRAI)ने बुधवारी 31 जानेवारी 2021 पर्यंतचा रिपोर्ट  जाहीर केला आहे. यामधून यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये ग्राहकांची टेली-डेन्सिटी सर्वांत जास्त आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओकडे सर्वाधिक म्हणजेच 35.03 टक्के मोबाईल ग्राहक आहेत. त्यातील 19.50 लाख नवे ग्राहक जानेवारी महिन्यांमध्ये जोडले गेले आहेत. 

तर 29.62% टक्क्यांनी दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल आहे. एअरटेलने 58.90 लाख अर्थात जिओच्या तीनपट नवे ग्राहक जोडले आहेत. यामध्ये टाटा टेली सर्व्हिसेस लि. चे ग्राहक जोडले जाणे देखील कारणीभूत आहे. ग्राहकांमध्ये वोडाफोन-आयडीयाचे 24.58 टक्के तर बीएसएनएलचे 10.21 टक्के आणि एमटीएनएलचे 0.28 टक्के ग्राहक आहेत. 

इंटरनेटचे एका महिन्यात एक कोटी नवे कनेक्शन
भारतात इंटरनेट ब्रॉडबँड 75.76 कोटी लोकांपर्यंत पोहोचले आहे. यामधील 73.42 कोटी इंटरनेट मोबाईल फोनमध्ये आहे. तर बाकी वायर-कनेक्शनवर आधारित इंटरनेट आहे. डिसेंबरमध्ये 74.74 कोटी लोकांकडे इंटरनेटची सुविधा होती. म्हणजे एक महिन्यात जवळपास 1.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. जिओ कंपनी या ठिकाणी देखील अग्रभागी राहिली आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेशात गतीने वाढ
जानेवारीमध्ये फक्त मुंबईमध्ये ग्राहक 0.28 टक्क्यांनी घटले. तर पश्चिम उत्तर प्रदेशात सर्वाधिक 6.45 टक्के ग्राहक वाढले. हिमाचलमध्ये 0.91 टक्के, दिल्लीमध्ये 0.83 टक्के, पूर्व उत्तर प्रदेशात 0.67 टक्के, हरियाणामध्ये 0.21 टक्के तर पंजाबमध्ये 0.09 टक्के ग्राहक वाढले. 

टेली-डेन्सिटी : 100 मधील 87 जण फोनवर
टेली-डेन्सिटीनुसार, प्रत्येकी 100 लोकांमागे जवळपास 87 लोकांचे फोन नंबर सक्रिय आहेत. यामध्ये सर्वांत पुढे दिल्ली आहे. याठिकाणी 100 लोकांमागे 274 फोन नंबर आहेत. तर बिहार सर्वांत मागे आहे. याठिकाणी टेली-डेन्सिटी फक्त 53.11 टक्के आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेशमध्ये ही 152 टक्के, केरळमध्ये 129 टक्के, पंजाबमध्ये 121 टक्के, तमिळनाडूमध्ये 106 टक्के नोंद आहे. उत्तर भारतातील बाकी राज्यांमध्ये हरियाणामधील हरियाणामध्ये 93.37 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 88.30 टक्के, उत्तर प्रदेशात 68.79 टक्क्यांवर आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT