Sahyadri Forest Journey esakal
टूरिझम

Sahyadri Forest Journey : 'शरीर आणि मन हलकं करणारा रानगंध'

ओढे-नाले गच्च रानपार करत चढा उतारानं बरीच पायपीट परतीला करावी लागणार होती.

सकाळ डिजिटल टीम

उलट छातीत तो भन्नाट वारा आणि रानगंध शरीर आणि मन हलकं करतात. ती इवली रानफुलं कौतुकानं आपल्याकडे पाहात असतात.

पावसातला, ढगातला, धुक्यातला, स्वच्छ उन्हातला हा चौकारण्यातला प्रवास अखेरीस बारमाही निवळ शंख असणाऱ्या खालच्या पाण्यापर्यंत येऊन पोहोचला होता. गच्च जंगलातली खालच्या पाण्यापर्यंतची पायपीट म्हणजे अरण्य अनुभूतीचा विलक्षण रोमांच अगदी झाडेच हिरवी नव्हेत तर दगडसुद्धा हिरव्यागार पाचूसारख्या बुरशीने वेढलेले. आरपार पारदर्शी पाण्याचे ते नितळ प्रवाह, त्यांचे सौंदर्य केवळ वर्णनातीत हे पाणी दरीत झेपावतं. ते फेसाळणारा प्रचंड जलप्रपात बनूनच.

पाण्याच्या वरच्या अंगाला चौकारण्यातला ‘खालचा भैरी’ प्रवाहाच्या काठाकाठाने त्या भैरीपर्यंत जाणं ही पुन्हा एक वेगळी रोमांचकारी अरण्यानुभती. सूर्याचा किरणही पोहोचणार नाही, अशा गच्च जंगलात पाण्याच्या प्रवाहाशेजारी दगडांच्या ओळीत एक वेगळा थोडा मोठा गोल तांदळा, तोच ‘भैरी’. भर जंगलात (Forest) शतकानुशतके वसलेल्या त्या भैरीला अक्षरश: साष्टांग दंडवत घातला. चौकारण्य अजून सरलं नव्हतं... सरणारही नव्हतं; पण दुपार उलटली होती. दिवस बुडायच्या आत माचाळ जवळ करणं आवश्यक होतं.

ओढे-नाले गच्च रानपार करत चढा उतारानं बरीच पायपीट परतीला करावी लागणार होती. सिंकाड्याचे आवाज वाढू लागले होते. शेकरुंचा चकचकाट शिगेला पोहोचला होता. पावसाचे पाणी जागोजागी मुबलक असलं तरी चराईसाठी संधीकालापासून गव्यांचा संचार वाढणार होता. अंधाराच्या आत जंगलातून बाहेर पडावं हा निसर्ग नियम आणि मुख्य म्हणजे तुकाराम आणि बहिणींचा स्वयंपाक वाडीत वाट पाहात होता. प्रत्येक जंगलात तीच झाडं, वेली, वृक्ष, पाणी-माती असलं तरी प्रत्येक जंगलाचा स्वभाव आणि सौंदर्य वेगळं असतं. त्याचा गंधही वेगळा असतो. काही जंगल कधी संपतील, असं होतं तर काही संपूच नये असं वाटतं, त्यातलंच हे चौकचं जंगल.

खरंतर हे चौकच जंगल मला पहिल्यांदा मूळचे प्रभानवल्लीच्या परिसरातले, परंतु आता कोल्हापूरकर असणारे चंदू नार्वेकर आणि उदय नागवेकरांनी सांगितल तेव्हापासून ते खुणावत होते. आज तो योग जुळून आला. सह्याद्रीच्या अंतरंगात अशा अनेक अस्पर्श जागा आहेत. त्यांचं सौंदर्य कल्पनातीत असतं अशा जागा कोणीतरी सांगतं. मग त्या जागा मनातून हटत नाहीत. सारख्या जणू बोलावतात. तेथे गेल्याशिवाय चैन पडत नाही.

तिथे आपण आणि निसर्गाशिवाय कोणीही नसतं. तिथे माणसांची गर्दी नसते. तिथे वारा मावत नाही. वास आफ्या गुदमरत नाही. उलट छातीत तो भन्नाट वारा आणि रानगंध शरीर आणि मन हलकं करतात. ती इवली रानफुलं कौतुकानं आपल्याकडे पाहात असतात. फांद्यावरचे पक्षी आपल्याकडे डोळा ठेवून असतात आणि हे सारं समजायला लागलं की आपणही त्यांच्यातलेच एक होऊन जातो आणि जंगल हे आपलं घर बनतं. (क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT