LIC 
Union Budget 2026 Updates

Union Budget 2021 : LIC बाबत मोठी घोषणा; विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढणार

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - Union Budget 2021 : केंद्र सरकारने 2014 मध्ये विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्के केली होती. आता ती 74 टक्के इतकी करण्यात असल्याची घोषणा अर्थसंकल्पावेळी केली. असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात एलआयसीच्या आयओपीचा उल्लेख केला. तसंच पुढच्या वर्षी अनेक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक होईल असंही त्यांनी सांगितलं.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या आयओपीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपीनी असलेल्या एलआयसीमधील भागिदारी विकण्याआधी त्याच्या मूल्यांकनासाठी अॅक्चुरिअल कंपन्यांकडून अर्ज मागवले जातील. तसंच आयओपीच्या प्रक्रियेसाठी सल्लागारांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जीवन विमा प्राधिकरणाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये एलआयसीचे समभाग शेअर बाजारात आणले जाणार आहेत असं सांगितलं आहे. यंदा एलआयसीवर आयोपी आणला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. एलआयसीचा आयओपी जवळपास 70 हजार कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

एलआयसीच्या एकूण मालमत्तांचे मूल्य सुमारे 13 लाख कोटी इतके आहे. याच्या 10 किंवा 15 टक्के समभागांची विक्री करून सरकार पैसा उभा करण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीच्या आयोपीची घोषणा केली. यासोबतच इतर काही कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT