Forestry dams being constructed in the taluka esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूर तालुक्यात 352 वनराई बंधारे पूर्ण : कृषी अधिकारी रविशंकर पाडवी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नदी-नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गावागावांत वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सध्या सुरू आहे. गावातील तरुण, शाळेचे विद्यार्थी, शेतकरी गट, महिला शेतकरी गट यांच्या सहकार्यातून व श्रमदान करून असे वनराई बंधारे बांधून त्यात पाणी अडविण्यात येत आहे.

नवापूर तालुक्यात ३५२ वनराई बंधारे पूर्ण झाले, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी दिली.(352 forest dams completed in Navapur district nandurbar news)

नवापूर तालुक्यात या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे प्रजन्यमान सरासरीच्या फक्त ७० टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊससुद्धा आला नाही. अशा स्थितीत नदी-नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून, रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे.

त्यासाठी पाणी आवश्यक आहे. नदी-नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर हे पाणी जागोजागी अडविणे गरजेचे आहे. यासाठीच महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गावागावांत वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सध्या सुरू आहे.

गावातील तरुण, शाळेचे विद्यार्थी, शेतकरी गट, महिला शेतकरी गट यांच्या सहकार्यातून व श्रमदान करून असे वनराई बंधारे बांधून त्यात पाणी अडविण्यात येत आहे. यामुळे नाल्यात जलसाठे निर्माण होत आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. या पाण्याचा शेतीसाठी, जनावरांसाठी चांगला उपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

काही शेतकरी डिझेल इंजिन व वीजपंपाचा वापर करून या साठलेल्या पाण्याचा उपयोग पिकांना पाणी देण्यासाठी करीत आहेत. या दौऱ्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनकर तावडे, सुलक्षणा वसावे, प्रशांत पाटील, राजेश गावित, राहुल शिरसाठ यांनी प्रयत्न केले.

कामांची प्रत्यक्ष पाहणी, जलपूजन

नुकतेच नवापूर तालुक्यात झालेल्या कामाची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, उपविभागीय कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांनी पाहणी केली व समाधान व्यक्त केले. या वेळी झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून वनराई बंधाऱ्यातील साठलेल्या पाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

तालुक्यातील झामट्यावड, चितवी, डाळीआंबा येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. वनराई बंधारे बांधण्याची मोहीम विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. तालुक्यासाठी ४३० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यांपैकी ३५२ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT