Farmer Waiting For Rain esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बळीराजाच्या नजरा लागल्या आकाशाकडे, Monsoonच्या आगमनाची प्रतीक्षा

योगीराज ईशी

Nandurbar News : या वर्षी हवामानतज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी वेळीच शेताची खरिपपूर्व मशागत करून शेती मशागती साठी सज्ज केली आहे.

पेहरणी साठी लागणारे बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची दुकानात गर्दी दिसून येत असून, पाऊस झाल्यावरच पेरणी होणार आहे; परंतु आज जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप वातावरणात पावसाचे संकेत दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता मात्र आकाशाकडे लागल्या आहेत. (Baliraja looked up at sky waiting for arrival of Monsoon Congestion at fertilizer-seed shop Nandurbar News)

या वर्षी मॉन्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच मशागतीची कामे वेळेवर आटोपली. वेळेवर पाऊस झाला तर पेरण्या वेळेवर होऊन उत्पादनवाढची अपेक्षा असते.

त्यामुळे यंदा अतिशय कडक उन्हाळा असतानाही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण केली. नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणे, शेणखत टाकणे आदी कामे पूर्णत्वास नेली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कमी वेळात मशागतीची कामे व्हावीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने शेतीकामे करण्यास प्राधान्य दिले आहे. अजूनही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देतात. अशा विविध पद्धतीने मशागतीची कामे केल्यानंतर, कर्ज घेऊन लागणारे बियाणे, खतखरेदी सुरू आहे.

मात्र तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने अर्धा जून आला, कडक ऊन व वातावरणात उकाडा कायम असल्याने पावसाची चिन्हे दिसत नसल्याने वेळेवर पेरणी होईल का, या विचाराने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकाशात तुरळक ढग भरून येतात. दिवसभर प्रचंड उकाडा होऊन सायंकाळी पुन्हा वातावरणात गारठा निर्माण होत आहे.

जुन्या जमान्यात ग्रामीण भागात शेतकरी पक्षाच्या घरटी बांधण्यावरून पावसाचा अंदाज वर्तवीत असे, मात्र असे काहीही संकेत दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात काही क्षेत्र बागायत वगळता बहुतांश भाग पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

कपाशी लागवडीवर परिणाम

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली; परंतु मागील महिन्यापासून सतत वीज खंडित होऊन, विजेचा लपंडाव सुरू आहे.

पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT