नंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेली अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरित पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विविध यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात अमृत सरोवर अभियान संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे आदी उपस्थित होते. श्रीमती खत्री म्हणाल्या, जिल्ह्यात अमृत सरोवर अभियानांतर्गत ९१ कामे करण्याबाबत विविध यंत्रणेने माहिती भरली असून त्यापैकी ७३ कामे प्रगतिपथावर असल्याने तलाव, शेततळी, नाला खोलीकरणाचे गाळ काढण्याची कामे पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण करावीत. वन विभागाने नरेगामध्ये अमृत सरोवराची अधिकाधिक कामे घ्यावीत. पूर्ण झालेल्या अमृत सरोवराचे जिओ टॅगची छायाचित्रे, अमृत सरोवराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती, वेळोवेळी होणाऱ्या कामांचा तपशिल, प्रशिक्षण तसेच सरोवरातून निघालेल्या अतिरिक्त गाळ, माती, मुरुम रस्ते, रेल्वे इतर कामासाठी दिला असल्यास त्याबाबतची माहिती ‘अमृत ॲप’ मध्ये अपलोड करावी. अमृत सरोवराच्या परिसरात वृक्ष लागवड व बांबूची लागवड करण्यात यावी. अशा सूचना त्यांनी दिल्या आहे.
उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी प्रास्ताविकात सुरु असलेल्या अमृत सरोवराची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, वने, कृषी, जलसंधारण, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.