overflow dam on the Mhais River.
overflow dam on the Mhais River. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : म्हैस नदीवरील धरण ओंसडले

सकाळ वृत्तसेवा

शहादा : लोंढरे (ता. शहादा) येथील म्हैस नदीवर बांधण्यात आलेले धरण जोरदार पावसामुळे काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे. धरण भरल्याने परिसरातील कूपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. (dam on river Mhais overflowed Nandurbar Latest News)

गेल्या चार दिवसापासून शहादा तालुक्यासह परिसरात पाऊस सुरूच आहे. गुरुवारी (ता.१५) पहाटेपासून ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील पाऊस झाल्याने म्हैस नदीला पूर आला. लोंढरे येथील धरण पावसाळ्यात भरलेले होते. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती.

धरण साधारणतः ७० टक्के भरले होते. या पावसामुळे धरण पुन्हा काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. परिसरातील १६ गावे या धरणाच्या सिंचन लाभ क्षेत्रात येतात. कळंबू गावापर्यंत धरणातून पाण्याचे पाट काढलेले आहेत.

गेल्या वर्षीच परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार धरणाची दुरुस्ती करण्यात आली होती. मुख्य बांधला भेगा पडल्याने पाण्याच्या निचरा होत होता. धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. मंत्री डॉ. विजयकुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धरण दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या.

धरण दुरुस्त झाल्यामुळे आता एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पाणी टिकू शकेल. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक धरण असून, शंभर टक्के भरल्याने शेतकरी आनंदित झाला असल्याचे जयननगर येथील महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT