Nandurbar Kharif Season esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Kharif Season : बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Kharif Season : खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत, मात्र बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (kharif season Agriculture department appeals to farmers to be careful while buying seeds nandurbar news)

अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.

खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्वक वाणाची निवड कशी करावी याबाबत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी नंदुरबार यांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

अशी घ्या काळजी

कपाशीचा दाणा निवडताना वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे

उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा

वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे

रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील/प्रतिकारक्षम वाण असावा.

बागायती, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य वाण निवडावे.

"शेतकऱ्यांनी कपाशीचा योग्य वाण निवडून खरेदी करून ठेवावे, सध्या तापमान जास्त आहे. त्यामुळे ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करावी." -स्वप्नील शेळके, तालुका कृषी अधिकारी, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT