kapus 
उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात आठ हजार क्विंटल कापसाची खरेदी- 5350 ते 5450 दरम्यान भाव 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  ः महाराष्ट्र राज्य को.-ऑपरेटिव्ह ग्रोवर्स मार्केटिंग फेडरेशनतर्फे गेल्या 27 एप्रिलपासून आजअखेर पर्यंत आठ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, दर्जाही खालावला होता. यामुळे मार्केटिंग फेडरेशन केवळ चांगल्या दर्जाचा (एफ.ए.क्‍यू.) मालच खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. चांगल्या कापसाला 5350 ते 5450 असा दर देण्यात येत आहे. 

लॉकडाऊनमुळे 24 मार्चपासून जिल्ह्यात कापूस खरेदी बंद होती. अनेक शेतकऱ्यांच्या घरात हजारो किंवटल कापूस पडून होता. 16 एप्रिलला लॉकडाऊनमधून कापूस केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही सी.सी.आय.च्या अधिकाऱ्यांनी मजुरांची अडचण दाखवीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास असमर्थता दाखविली होती. शेतकऱ्यांचा कापूस घरात पडल्याने लाखों रुपयांचे नुकसान होणार होते. आताजर कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाहीतर मे महिन्यात पाऊस केव्हा येईल व घरातला कापूस घरातच राहील. यामुळे "सकाळ'ने "कापूस उत्पादकांच्या व्यथा' मालिका सुरू करून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याची दखल म्हणून मार्केटिंग फेडरेशनने 27 एप्रिलपासून जिल्ह्यात पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल या केंद्रावर दररोज 25 ते 30 गाड्या कापूस खरेदी केला जातोय. 

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे त्यांना कोणत्या दिवशी उपस्थित राहावे, याबाबतचा "मेसेज' पाठविण्यात येत आहे. ज्यांनी ऑफलाइन कपाशीची नोंदणी केली आहे त्यांनाही मेसेज पाठविला जाईल. आज शनिवार व उद्या (ता.3) रविवार (पाच दिवसांचा आठवडा) असल्याने ही केंद्रे बंद होती. सोमवारपासून कापूस खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT