jalgaon kachra dhig imege
jalgaon kachra dhig imege 
उत्तर महाराष्ट्र

मनपा'च्या नियोजनशून्यतेमुळे 75 कोटी कचऱ्यात! 

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जगभरात दहशत पसरविणाऱ्या "कोरोना'चे महाराष्ट्रावरही सावट आहे. त्यादृष्टीने प्रत्येक शहरात, गावांमध्ये स्वच्छतेकडे लक्ष दिले जात असताना जळगाव शहरातील स्थिती उलट आहे. महापालिका प्रशासन, स्वच्छतेचा मक्ता दिलेली वॉटरग्रेस कंपनी या दोघांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून, अनेक ठिकाणी "ब्लॅक स्पॉट' तयार झाले आहेत. जळगाव महापालिकेने स्वच्छतेसाठी 75 कोटींचा एकमुस्त ठेका नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला दिला, मात्र या मक्‍त्याचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंतची स्थिती बघता 75 कोटी कचऱ्यातच जातील की काय, असे चित्र आहे. 

75 कोटी कचऱ्यात 
पाच महिन्यांपूर्वी महापालिकेने दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा 75 कोटींचा मक्ता नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला पाच वर्षांसाठी दिला. परंतु, पहिल्या दिवसापासून मक्‍तेदाराच्या कामावर विरोधी सदस्य, सत्ताधारी सदस्य तसेच नागरिकांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. त्यात सफाई व्यवस्थित न करणे, वजन वाढविण्यासाठी कचऱ्याऐवजी माती वाहून नेणे असे अनेक प्रकार घडले होते. तसेच महापालिकेकडून लावण्यात आले दंड, दंड माफ करणे आदी मुद्यांवरून महापालिकेच्या अनेक स्थायी व महासभेत देखील चर्चा होऊन सदस्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केला होता. 

 आर्वजून पहा : भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप !

नियोजन नसल्याने दुरवस्था 
शहरात "कचरा'कोंडीची वेळ ही केवळ महापालिका प्रशासनातील अधिकारी तसेच मक्तेदार यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आली आहे. दोघांमध्ये समन्वय नसल्याने शहरातील स्वच्छतेचा तसेच सफाईचे बिले काढण्यापासून तर करारनाम्यानुसार दंड आकारणी, कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे, बिले लवकर न देणे आदी विविध समस्या या वाढत गेल्याने सफाईच्या मक्‍त्याचा विषय गुंतागुंतीचा बनला आहे. 

अधिकारी, पदाधिकारी शांत 
गेल्या 20 दिवसांपासून शहरात स्वच्छतेचे काम मक्तेदाराने थांबविले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याकुंड्या ओसंडून वाहत असून, जागोजागी कचरा पडलेला आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींकडून शहरातील हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, हे प्रयत्न अपूर्ण आहे. तसेच महापालिकेतील 75 नगरसेवकांपैकी केवळ शिवसेनेच्या अनंत जोशी, नितीन बरडे या दोन नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यामुळे इतर नगरसेवक शहर गलिच्छ होत असताना शांत कसे राहू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मक्तेदाराने पुन्हा काम सुरू करण्याची तयारी दर्शवली असली तरी महापालिका प्रशासन पर्यायी व्यवस्था तयार करत आहे. त्यासाठी थोडा वेळ लागत असला तरी आमच्याकडे शहरातील स्वच्छतेचा "मास्टर प्लॅन' तयार असून कर्मचारी उपलब्धतेवर तो आम्ही सुरू करू. 
भारती सोनवणे, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT