uddhav thackeray
uddhav thackeray 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढणार : मुख्यमंत्री ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शेतकरी हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जातून मुक्‍त करण्यासाठी पाऊल उचलत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रथमोचार असून, शेतकऱ्यांना या कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढण्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे. हा प्रयत्न पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी आणखी उपाय योजना केले जातील असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. 


जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कृषीमंत्री दादा भूसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे एकाच वेळी स्वागत करण्यात आले. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की पवार- ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी; याचा अर्थ महाविकास आघाडीत अंतर नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता असल्याने त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाऊल उचलणार असल्याचे देखील ते म्हणाले. भविष्यात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्‍यकता असून, हे तंत्रज्ञान जैन इरिगेशन विकसीत करत असल्याने शेतकऱ्याने या तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक होईल; अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. 


राज्याच्या प्रत्येक भागात पाणी पोहचवा : शरद पवार 
देशाच्या प्रगतीचे श्रेय जितके वैज्ञानिकांना आहे तितकेच श्रेय काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला देखील आहे. कृषी क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना देखील शेतकरी हा मेहनत करत असतो. शेतकऱ्याच्या मेहनतीला मदतीची जोड मिळाली तर आणखी प्रगती करू शकेल. तसेच राज्यातील मराठवाडा, खानदेश तहानलेला असून, केंद्र व राज्य सरकाने महाष्ट्राच्या प्रत्येक भागात पाणी पोचविण्याचे काम करावे; असे मत शरद पवार यांनी यावेळी मांडले. 

केळी संशोधन केंद्राकडे वर्ग करा : पालकमंत्री पाटील 
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. देशातील केळीच्या उत्पादनापैकी सर्वाधिक 20 टक्के उत्पादन जिल्ह्यात होत आहे. तेलबिया संशोधन केंद्राची 100 एकर जमीन उपलब्ध असून ती केळी संशोधन केंद्राकडे वर्ग करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT