उत्तर महाराष्ट्र

कृषि विद्यापीठ परिक्षा नियोजन कृति आराखडा जाहिर.. अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये ! 

सकाळवृत्तसेवा

वाकोद (ता. जामनेर )  : राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृति आराखडा कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज जाहिर केला. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

कृषिमंत्री श्री. भुसे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी या कृती आराखड्याबाबत माहिती देतांना कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील बहुतेक कृषि महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहीत केलेली आहे. सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला आहे. यात प्रामुख्याने कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. कृषि तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मुल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५०टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ८ ते १५ जूनच्या दरम्यान घेण्यात येईल.

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल. त्याकरिता ५० टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत देण्यात येतील आणि उर्वरीत ५० टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर आधारीत देण्यात येतील. तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने १५ जून पूर्वी घेण्यात येतील. या परिक्षेचा निकाल हा १५ जुलै पुर्वी जाहीर करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतल्या जातील. शोधनिबंध सादर करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याच प्रमाणे पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी १ ऑगस्ट रोजी होणार असून, पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्राची नोंदणी १ जुलै रोजी होणार आहे. तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश हे १ सप्टेंबर पासून सुरू होतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway : विकेंडला ३०० लोकल रद्द! पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाचा कधी आणि का?

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन

आलिया, अनन्या पेक्षाही जास्त मानधन घेते श्रद्धा कपूर; मुलीबद्दल शक्ती कपूर बोलले ते खरं आहे का? हे आहे सत्य

TET Result 2025 : टीईटी निकालाची तारीख ठरली? उत्तरसूचीवर हरकतीसाठी शेवटची संधी; साडेतीन लाख उमेदवारांची प्रतीक्षा संपणार

Morning Skincare Routine Tips: सकाळी सगळ्यात आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायचं की मॉइश्चरायझर? जाणून घ्या स्किनकेअर रूटीन टिप्स

SCROLL FOR NEXT