Youth leader Aditya Thackeray inspecting the drought area. Neighbor former MLA Anil Kadam.  esakal
नाशिक

Aditya Thackeray News : असंवेदनशील सरकारला जाब विचारणार : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

Aditya Thackeray News : दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही. पीकविमा कंपनी पिके वाया जाऊनही शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देत नाही. सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही, तर कोणतेही पीक हातात येत नाही, हे प्रशासनाला माहिती आहे.

अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे. पीक पंचनामे अजूनही सुरू नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे.

या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. (Aditya Thackeray statement about government nashik news)

निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थिती पाहणी करताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, तालुकाध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे, भाऊसाहेब कमानकर, शरद खालकर, खंडू बोडके, शरद कुटे, अश्पाक शेख, दिलीप कदम, रामदास खालकर, श्याम खालकर यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील अनेक गावात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. विकत पाणी घेऊन पिकवलेली टोमॅटो, भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.

शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील भेंडाळी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टोमॅटो आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पाहणी ठाकरे यांनी केली.

यावेळी फसवे कांदा अनुदान, फसवी कर्जमाफी, जिल्हा बँकेचे कर्जवाटप बंद, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, खरीप हंगाम गेला आता शेतकऱ्यांनी मुलांच शिक्षण कसे करावे, लग्न कसे करावे, कुटुंब कसे चालवावे, आरोग्याचा प्रश्न कसा सोडवावा, असा अनेक समस्यांचा पाढा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला.

या वेळी ठाकरे म्हणाले, की हे घटनाबाह्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. लोकांची भीती यांना नाही. त्यामुळे ते बिनधास्त कुठे काही बोलतात. प्रत्येक घटकाला केवळ आश्वासन देतात. शेतकरी आर्थिक समस्यांमध्ये असताना अद्याप दुष्काळ परिस्थितीवर कोणतेही पाऊल सरकारने उचलले नाही; पण आम्ही सरकारला याचा जाब विचारू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT