Youth leader Aditya Thackeray inspecting the drought area. Neighbor former MLA Anil Kadam.  esakal
नाशिक

Aditya Thackeray News : असंवेदनशील सरकारला जाब विचारणार : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

Aditya Thackeray News : दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही. पीकविमा कंपनी पिके वाया जाऊनही शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देत नाही. सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही, तर कोणतेही पीक हातात येत नाही, हे प्रशासनाला माहिती आहे.

अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे. पीक पंचनामे अजूनही सुरू नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे.

या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. (Aditya Thackeray statement about government nashik news)

निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थिती पाहणी करताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, तालुकाध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे, भाऊसाहेब कमानकर, शरद खालकर, खंडू बोडके, शरद कुटे, अश्पाक शेख, दिलीप कदम, रामदास खालकर, श्याम खालकर यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील अनेक गावात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. विकत पाणी घेऊन पिकवलेली टोमॅटो, भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.

शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील भेंडाळी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टोमॅटो आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पाहणी ठाकरे यांनी केली.

यावेळी फसवे कांदा अनुदान, फसवी कर्जमाफी, जिल्हा बँकेचे कर्जवाटप बंद, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, खरीप हंगाम गेला आता शेतकऱ्यांनी मुलांच शिक्षण कसे करावे, लग्न कसे करावे, कुटुंब कसे चालवावे, आरोग्याचा प्रश्न कसा सोडवावा, असा अनेक समस्यांचा पाढा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला.

या वेळी ठाकरे म्हणाले, की हे घटनाबाह्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. लोकांची भीती यांना नाही. त्यामुळे ते बिनधास्त कुठे काही बोलतात. प्रत्येक घटकाला केवळ आश्वासन देतात. शेतकरी आर्थिक समस्यांमध्ये असताना अद्याप दुष्काळ परिस्थितीवर कोणतेही पाऊल सरकारने उचलले नाही; पण आम्ही सरकारला याचा जाब विचारू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT