bachu kadu.jpg
bachu kadu.jpg 
नाशिक

''साहेब, पालखेडचं पाणी नेमकं मुरतंय कुठं?'' येवलेकरांच्या समस्या थेट बच्चू कडू यांच्याकडे

संतोष विंचू

येवला (नाशिक) : पालखेड डाव्या कालव्याचे पाणी म्हणजे मोठे गौडबंगाल असून प्रासंगिक आरक्षणाच्या नावाखाली नेहमीच शेतीला कमी पाणी दिले जाते. पाणी वापर संस्थांना मंजूर कोट्याच्या तुलनेत कमी पाणी देऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय दाखवला जातो. त्यामुळे येवलेकरांना शेतीला नेहमीच कमी पाणी मिळते. साहेब, यात लक्ष घालून आमचे हक्काचे पाणी आम्हांला मिळवून द्या, अशी साद येथील शिष्टमंडळाने जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना घातली.

तालुक्याच्या हक्काचे पाणी नेमकं मुरते कुठे?

येवला तालुका प्रहारच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री बच्चू कडू यांची औरंगाबाद येथे भेट घेतली. तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालखेड डाव्या कालव्याचे दिवसेंदिवस कमी होत जाणारे पाणी नेमके कुठं मुरते. त्यात कुणाचे अन् कसे हितसंबंध गुंतले आहेत. तालुका सतत दुष्काळी असलेने सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यातून सुमारे ५२ टक्के साठा येवला तालुक्यासाठी आरक्षित असताना आज एकूण लाभक्षेत्राच्या २० टक्केच पाणी सिंचनासाठी उपलब्ध होते. तालुक्याच्या हक्काचे पाणी नेमकं मुरते कुठे? हेच कळेनासे झाल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन यांनी सांगितले. आज अख्ख्या राज्यभर बाष्पीभवन व वहनव्यय १५ टक्क्यांच्या आसपास असतांना केवळ याच पालखेड कालव्याचा वहनव्यय ८० टक्क्यांपर्यंत दाखविल्या जातो.

लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन

विशेष म्हणजे यावर सर्वपक्षीय अळीमिळीचेच धोरण गेल्या अनेक वर्ष बघायला मिळत असून कुणीही उघडपणे यावर बोलत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे राज्यमंत्री कडू यांना सांगण्यात आले. तसेच यावर तालुका प्रहारने गाऱ्हाणं मांडल्यावर त्यांनी यावर लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.
 तसेच एरंडगाव येथील पडीत आसलेली जलसंपदा विभागाची जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची यादीच शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांचेकडे सादर केली. लाभ मिळवून देण्याची मागणी केली. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले.

यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे, संतोष रंधे, वाशीम शेख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT