bachu kadu.jpg 
नाशिक

''साहेब, पालखेडचं पाणी नेमकं मुरतंय कुठं?'' येवलेकरांच्या समस्या थेट बच्चू कडू यांच्याकडे

संतोष विंचू

येवला (नाशिक) : पालखेड डाव्या कालव्याचे पाणी म्हणजे मोठे गौडबंगाल असून प्रासंगिक आरक्षणाच्या नावाखाली नेहमीच शेतीला कमी पाणी दिले जाते. पाणी वापर संस्थांना मंजूर कोट्याच्या तुलनेत कमी पाणी देऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय दाखवला जातो. त्यामुळे येवलेकरांना शेतीला नेहमीच कमी पाणी मिळते. साहेब, यात लक्ष घालून आमचे हक्काचे पाणी आम्हांला मिळवून द्या, अशी साद येथील शिष्टमंडळाने जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना घातली.

तालुक्याच्या हक्काचे पाणी नेमकं मुरते कुठे?

येवला तालुका प्रहारच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री बच्चू कडू यांची औरंगाबाद येथे भेट घेतली. तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालखेड डाव्या कालव्याचे दिवसेंदिवस कमी होत जाणारे पाणी नेमके कुठं मुरते. त्यात कुणाचे अन् कसे हितसंबंध गुंतले आहेत. तालुका सतत दुष्काळी असलेने सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यातून सुमारे ५२ टक्के साठा येवला तालुक्यासाठी आरक्षित असताना आज एकूण लाभक्षेत्राच्या २० टक्केच पाणी सिंचनासाठी उपलब्ध होते. तालुक्याच्या हक्काचे पाणी नेमकं मुरते कुठे? हेच कळेनासे झाल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन यांनी सांगितले. आज अख्ख्या राज्यभर बाष्पीभवन व वहनव्यय १५ टक्क्यांच्या आसपास असतांना केवळ याच पालखेड कालव्याचा वहनव्यय ८० टक्क्यांपर्यंत दाखविल्या जातो.

लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन

विशेष म्हणजे यावर सर्वपक्षीय अळीमिळीचेच धोरण गेल्या अनेक वर्ष बघायला मिळत असून कुणीही उघडपणे यावर बोलत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे राज्यमंत्री कडू यांना सांगण्यात आले. तसेच यावर तालुका प्रहारने गाऱ्हाणं मांडल्यावर त्यांनी यावर लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.
 तसेच एरंडगाव येथील पडीत आसलेली जलसंपदा विभागाची जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची यादीच शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांचेकडे सादर केली. लाभ मिळवून देण्याची मागणी केली. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले.

यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे, संतोष रंधे, वाशीम शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT