Actor Bharat Jadhav  esakal
नाशिक

नाट्य अभिनेते, निर्मात्यांना चांगले दिवस यावे : भरत जाधव

.

तुषार महाले

नाशिक : नाट्यक्षेत्रात अभिनेता प्रशांत दामले किंवा भरत जाधव यांच्या नाटकांचे प्रयोग व्हावे असे नाही तर महाराष्ट्रभर सर्व नाट्य अभिनेते, निर्मात्यांच्या नाटकांचे प्रयोग होत चांगले दिवस यायला हवे. यासाठी शंभर टक्के नाट्यक्षेत्र सुरू होण्याची गरज असल्याचे अभिनेता, निर्माते भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी ‘सकाळ’ शी बोलताना स्पष्ट केले.

कोरोनानंतर (Corona) पहिल्यांदाच व्यावसायिक ‘सही रे सही’ नाटकाचा प्रयोग शनिवारी (ता.१३) कालिदास कलामंदिर येथे झाला. यानिमित्त नाशिकमध्ये आलेले भरत जाधव यांच्याशी संवाद साधला असता भरत जाधव म्हणाले, की कोरोनाकाळात पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी पुरेपूर प्रयत्न केला. नाट्यगृह सुरू करण्यासाठी उशीर झाला परंतु आता मागे न वळता यापुढील काळात निर्मात्यांचे धाडस यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनात नाट्यक्षेत्र बंद असल्याने कलाकारांसह पडद्यामागील कलाकारांना फार मोठा फटका बसला आहे. नफा तोटा दूरची गोष्ट असून नाटक सुरू होणे आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोरोनात पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची भयानक परिस्थिती होती. पैसे मागायचे कुणाकडे असा प्रश्न पडला होता, अनेक जणांची मदत करून कलाकारांना त्या विंवचनेतून बाहेर काढले आहे. नाशिककरांनी ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ ‘ऑल द बेस्ट’ नाटकांना प्रतिसाद दिला आहे. कोरोनाची सर्व काळजी घेऊन प्रयोग सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.





या निर्णयाची आतुरतेने वाट पाहतोय

नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणेमुळे हवा आतल्या आत खेळती राहते. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका संभावतो , असा तांत्रिक मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मांडला होता. तो आम्हा सगळ्यांना पटला असल्याचे अभिनेता भरत जाधव यांनी नमूद केले. मुख्यमंत्री ठाकरे परिस्थिती बघून निर्णय घेणार असले तरी नाट्यगृह शंभर टक्के प्रेक्षक क्षमेतेने केव्हा सुरू होतील याची आतुरतेने वाट पाहतो आहे, असे अभिनेता भरत जाधव यांनी नमूद केले.



उठा आणि कामाला लागा

‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ ‘ऑल द बेस्ट’ अशा नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी कोरोनाची मरगळ दूर सारत ताजेतवाने होण्यासाठी नाटक पाहायला यावीत जेणेकरून नाट्यकर्मींना सुगीचे दिवस पुन्हा अनुभवास मिळतील. कोरोनामुळे लोकांमध्ये नैराश्याची भावना पसरली असून, नाटकांनी निखळ मनोरंजन होणार असून प्रेक्षकांसाठी उठा आणि कामाला लागा अशी वेळ आली असल्याचे अभिनेता भरत जाधव यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT